मुंबई

खाडीपात्रात भूमाफियांची अरेरावी

CD

किरण घरत ः सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता. ३ : पानवेली तसेच तिवरांनी नटलेल्या कळवा खाडीपात्रात बेकायदा झोपड्यांच्या घुसखोरीमुळे स्मार्ट शहराचा नावलौकिक असणाऱ्या ठाणे शहराचे पर्यावरणही धोक्यात आले आहे. शहरातील कळवा, खारेगाव, विटावा भागात मोठ्या प्रमाणात तिवरांची कत्तल करून बेकायदा झोपड्या वसवण्यात आल्या असून, भूमाफियांच्या अरेरावीमुळे संपूर्ण परिसर बकाल झाला आहे
युरोपच्या धर्तीवर ठाण्यातील ३४ किलोमीटरचा खाडीकिनारा विकसित केला जाणार आहे, परंतु कळवा खाडीपात्रापासून मुंब्रा रेतीबंदरपर्यंत कळवा जानकी नगर ते विटावा, खारेगावपर्यंत खाडीपात्रात गेल्या काही वर्षांत बेकायदा झोपड्या वसल्या आहेत. या कच्च्या झोपड्यांमध्ये राहणारे रहिवासी केरकचरा, प्लॅस्टिक पिशव्या, भंगार वस्तू खाडीपात्रामध्ये टाकतात. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहातील मलमूत्रदेखील खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे खाडीचे पात्र प्रदूषित झाले असून, सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे, स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे शहराच्या नावलौकिकाला धक्का बसला आहे, तर राजकीय वरदहस्तामुळे झोपड्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस कारवाई करणे आवश्यक झाले आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीच्या सहा. आयुक्त खाडी ललिता जाधव यांनी किनाऱ्यावरील झोपड्यांना खाली करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. तसेच नवीन बेकायदा झोपड्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
----------------------------------------
राजकीय पक्षांची व्होट बॅंक
राजकीय पक्षांसाठीची या झोपड्या व्होट बॅंक ठरत आहेत. त्यामुळे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव येत असल्याने बेकायदा झोपड्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. राजकीय दबावातून महापालिका या झोपड्यांना पाणीपुरवठा करते. तसेच कर आकारणी करताना महावितरणकडून वीजपुरवठाही केला जातो. त्यामुळे राजकीय पाठबळाच्या जोरावर भूमाफियांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.
-----------------------------------
प्रशासकीय यंत्रणांमध्ये मतभेद
कळवा पुलाजवळचा भाग शासनाच्या मेरिटाइम बोर्डाच्या म्हणजे ठाणे तहसीलदारांच्या अंतर्गत येतो. तर कळवा जानकीनगर, सायबानगर, विटावा हा खाडीकिनारा ठाणे महापालिकाअंतर्गत येतो. खारभूमी विभागाने प्रादेशिक बंदर विभागाकडे जबाबदारी सोपविली आहे. पण खाडी परिसर ठाणे जिल्हाधिकारी महसूल विभागाच्या अंतर्गत येत असल्याने झोपड्यांवर कारवाई करण्यावरून प्रशासकीय यंत्रणांमध्ये मतभेद आहेत.
-------------------------------------------
ठाणे शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे, मात्र खाडीकिनाऱ्यावरील बेकायदा झोपड्यांमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येते.
- संतोष पाटील, रहिवासी, कळवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT