काळू नदीचा रुद्रावतार
ग्रामीण भागात गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल
टिटवाळा, ता. १९ (वार्ताहर) : दोन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागात जनजीवन विस्कळित झाले आहे. कल्याण तालुक्यातील नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. रूंदे गावातील काळू नदीवर पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे फळेगाव, रूंदे, उशिद, हाल, मढ, पळसोली, काकडपाडा, दानबाव, आंबिवली, आराळे, भोंगळपाडा या गावांचा शहराशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
पूल पाण्याखाली गेल्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर नागरिक अडकून पडले आहेत. चाकरमानी, व्यापारी, रिक्षाचालक, दूध व भाजीपाला विक्रेते यांचे हाल सुरू झाले आहेत. अनेकांना वेळेवर कामावर पोहोचता आले नाही. तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठाही थांबलेला आहे. सध्या स्थानिक नागरिक पुलावरील पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करीत उभे आहेत. तर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. हवामान खात्याने पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून अतिजलद उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.