मुरबाड, ता. ५ (वार्ताहर)ः भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ परिसरातील जागेवर अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणाच्या प्रशासकीय तसेच न्यायालय लढाईत सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी तन, मन आणि धन देऊन लढाईत सहभागी व्हा, असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादा अभंग यांनी केले.
मुरबाड येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी पदाधिकारी नियुक्तीची एक बैठक झाली. या बैठकीत दादा अभंग यांनी भीमा कोरेगावचा इतिहास, भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरात झालेले अतिक्रमण तसेच या अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय व न्यायालय लढाई याचे महत्त्व कार्यकर्त्यांना विस्तृतपणे सांगितले. तसेच ही न्यायालयीन लढाई किती महत्त्वाची आहे. भीमा कोरेगाव जयस्तंभ आणि परिसराचा विकास होणार नाही. न्यायालय प्रकरण सुरू असल्याने भीमा कोरेगाव व परिसरातील विकास खोळंबल्याची सविस्तर माहिती दिली. तसेच भीमा कोरेगावची न्यायालय लढाई एका पक्षाची एका व्यक्तीची एका संघटनेची एका संस्थेची नाही तरी प्रत्येक व्यक्तीची स्वतःची लढाई असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.