खाडीत रसायनयुक्त विषारी पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा
बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांची विधानसभेत मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : नवी मुंबईतील खाडीत रसायनयुक्त विषारी पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातील औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे.
नवी मुंबईतील प्रमुख किनारपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळे, बेलापूर, सारसोळे, वाशी, दिवा या ठिकाणी स्थानिक कोळी बांधव मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत, परंतु नवी मुंबईतील एमआयडीसीमधील कंपन्यांमार्फत सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त विषारी पाण्यांमुळे जलप्रदूषण होत आहे. याचे माशांवर विपरीत परिणाम होत आहेत. या समस्येबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेमध्ये आवाज उठविला आहे. या वेळी त्या म्हणाल्या की, या रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीतील मासेमारी धोक्यात येणार आहे. ज्या कंपनीची पाइपलाइन किनारपट्टीकडे गेली आहे, अशा कंपन्यांना रसायनयुक्त दूषित पाणी हे शुद्धीकरण करून सोडण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी या वेळी केली. संबंधित रसायनयुक्त विषारी पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर शासन कारवाई करणार का? व सदरच्या रसायनयुक्त विषारी पाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचे शुद्धीकरण करून सोडण्याचे आदेश देणार का ? तसेच कोकण किनारपट्टीतील स्थानिक कोळी बांधवांना योग्य तो न्याय देण्याकरिता शासन पाऊल उचलणार का? असे विविध सवाल उपस्थित करून आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.