मुंबई

धोकादायक प्रवास कायमच

CD

कासा, ता. २० (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कोसेसरी, भवाडी येथील नागरिकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही जीव धोक्यात घालून सूर्या नदी पार करीत प्रवास करावा लागत आहे. रुग्ण, वृद्ध आणि विशेषतः विद्यार्थी यांना या धोकादायक प्रवासाचा मोठा फटका बसत आहे. दररोज ६० ते ७० विद्यार्थी शिक्षणासाठी लाकडी होडी किंवा तराफ्यावरून नदी पार करतात.

या परिसरातील नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामपंचायतीकडून गेल्या अनेक वर्षांपासून नदीवर पूल बांधण्याची मागणी होत होती. माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश करमोडा यांच्या पुढाकाराने व अनेक ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी पुलासाठी निधी मंजूर करण्यात आला. तत्पूर्वीच पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम आणि आमदार श्रीनिवास वनगा यांच्या उपस्थितीत पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रत्यक्षात चार महिने कोणतेही काम सुरू झाले नाही.

१५ मार्च २०२४ रोजी पुलाच्या कामास सुरुवात झाली; परंतु सध्या या पुलाचे केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले असून, पावसाळ्यामुळे काम थांबवण्यात आले आहे. यामुळे यंदाही येथील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सूर्या नदी पार करताना जीवावर उदार होऊन लाकडी होड्या किंवा तराफ्यांचा वापर करावा लागत आहे.

या परिसरातील विद्यार्थी सोलशेत, सारशी, तलवाडा व कासा येथे पुढील शिक्षणासाठी जातात; मात्र नदीवर पूल नसल्यामुळे त्यांना सायवनमार्गे १८ ते २० किमीचा वळसा घालावा लागतो. या मार्गावर सार्वजनिक वाहतुकीचे साधन अत्यल्प असल्याने आणि प्रवासाचा वेळ व खर्च दोन्ही वाढल्याने बहुतांश विद्यार्थी नदी पार करण्याचा धोकादायक पर्याय निवडतात.

सुरक्षा व शैक्षणिक गरजांच्या दृष्टीने कोसेसरी, भवाडीतील नदीवरील पूल अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

पूर आल्यावर संघर्ष
काही वर्षांपूर्वी एका सामाजिक संस्थेने होडीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट्स दिली होती; मात्र मुसळधार पावसात नदीला पूर येतो आणि अपघाताचा धोका अधिक वाढतो. अशा परिस्थितीत लहान मुलांचा जीव धोक्यात घालून शिक्षणासाठीचा संघर्ष अजूनही कायम आहे.

धोका कायम
ग्रामस्थ महेंद्र राबड म्हणाले, यावर्षी तरी पूल पूर्ण होईल आणि आमचा जीवघेणा प्रवास थांबेल, अशी अपेक्षा होती; पण काम अर्धवटच राहिल्याने यंदाही तोच धोका कायम आहे.

पावसानंतर कामाला वेग
डहाणू बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन पगार यांनी सांगितले, की पुलाचे सध्या ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसामुळे काम थांबले असले तरी मेपर्यंत काम पूर्ण होईल.

गेल्या वर्षी निधी मंजूर झाला आणि काम सुरू झाले; मात्र पूल अपूर्ण असून यंदाही मुलांना आणि ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यामुळे पावसाळा संपताच काम पुन्हा सुरू व्हावे, ही आमची मागणी आहे.
- शैलेश करमोडा, माजी जिल्हा परिषद सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Rummy Video : रमी नव्हे तर 'हा'गेम खेळत होतो… माणिकराव कोकाटेंनी काय दिलं स्पष्टीकरण?

Manikrao Kokate Rummy: कृषीमंत्री कोकाटेंच्या 'रमी' व्हिडिओनंतर ऑनलाईन गेमिंगवर बंदी येणार का? फडणवीस काय म्हणाले होते?

Ahilyanagar: डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते अनावरण: संग्राम जगताप; २७ जुलैला हाेणार अनावरण

WCL 2025 Video: क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल-आऊट! द. आफ्रिकेने विंडीजवर मिळवला थरराक विजय

Mumbai News: अनधिकृत बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन! न्यायालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाईची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT