मुंबई

लेखी आश्वासनानंतर परिचारिका कामावर रुजू

CD

परिचारिकांचा संप मागे
लेखी आश्वासनानंतर कामावर रुजू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : राज्यात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेला परिचारिकांचा संप अखेर गुरुवारी (ता. २४) मागे घेण्यात आला. या संपामुळे राज्यातील ३५ सरकारी रुग्णालयांमध्ये दररोज सुमारे १,००० शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या. आता रखडलेल्या शस्त्रक्रिया पूर्वपदावर येतील, असा विश्वास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुमित्रा तोटे यांनी व्यक्त केला.
या संपामुळे रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. जे. जे. रुग्णालयात अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या, तर मेडिकल वॉर्ड रिकामा होता. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यव्यापी संप स्थगित करण्याची घोषणा केली. अवर मुख्य सचिव (वैद्यकीय शिक्षण व संशोधन) धीरज कुमार यांच्यासह झालेल्या बैठकीत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. संघटनेच्या मते बैठकीत त्यांच्या मुख्य मागण्यांवर गंभीर चर्चा झाली आणि त्यांना प्रशासनाकडून लेखी आश्वासनही मिळाले. या सकारात्मक बैठकीनंतर संघटनेने सध्या आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अवर मुख्य सचिव धीरज कुमार यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली. त्यांनी मागण्यांविषयी लेखी स्वरूपात आश्वासन दिले. त्यामुळे राज्यव्यापी काम बंद आंदोलन स्थगित केले आहे,’ असे सुमित्रा तोटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavan Clash: धक्कादायक! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये राडा, थेट बुटाने मारण्याची धमकी

AI for Kids: पाचवीची मुले घेताहेत 'एआय'चे धडे; जाणून घ्या काय आहे 'या' खास पुस्तकात

Pimpalgaon Baswant : पिंपळगावात तिजोरी रिकामी, विकासकामे ठप्प; नगर परिषदेसमोर 'भीक मांगो' आंदोलन

''बेफाम गुन्हेगारी वाढलेल्या सरकारला मी पाठिंबा देतोय...'' चिराग पासवान यांनी स्पष्ट सांगितलं

Mumbai - Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनला मृत्यूचा सापळा! ३३५ जणांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT