राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी
एकत्रित प्रयत्न हवेत : नितेश राणे
तलावातील गाळ काढण्यासाठी कालबद्ध कृती आराखड्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी असून, यंदाच्या हंगामात ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. येत्या हंगामात ही वाढ आणखी होण्यासाठी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. तलावातील गाळ काढल्यास गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. त्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले.
मंत्रालयात सोमवारी मत्स्यव्यवसाय हंगामाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक उपस्थित होते. तर राज्यातील प्रादेशिक उपायुक्त आणि सर्व सहाय्यक आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. मंत्री राणे म्हणाले, ‘ड्रोन सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर सागरी मत्स्योत्पादनात चांगली वाढ झाली आहे. त्याच धर्तीवर तलावातील गाळ काढल्यास गोड्या पाण्यातील उत्पादनातही वाढ होईल. यासाठी जलसंपदा विभागाशी समन्वय साधून कार्यक्रम आखावा, तलावांवरील अतिक्रमणे दूर करावीत आणि कोणतेही नियमबाह्य काम होणार नाही याची अधिकारी दक्षता घ्यावी. शिस्त जितकी चांगली उत्पादन तितके वाढते.
----
देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष द्या!
‘प्लास्टिकमुक्त कोळीवाडा’ या योजनेला गती देण्याचे, मत्स्योत्पादकांना स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी प्रोत्साहन देण्याचे आणि अमेरिकेने लावलेल्या अतिरिक्त कराचा विचार करता देशांतर्गत बाजारपेठेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन राणे यांनी केले. यासाठी संबंधित कंपन्यांशी चर्चा, उत्पादकांमध्ये जागृती तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापराचे प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.