मुंबई

तिकीट दरवाढ बेस्टची ; भार रेल्वेवर

CD

बेस्टची दरवाढ लोकलच्या पथ्यावर
दैनंदिन प्रवासीसंख्येत तब्बल दोन लाखांची भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या प्रवासीसंख्येत वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मध्य रेल्वेच्या दैनंदिन प्रवासीसंख्येत तब्बल दोन लाखांची वाढ झाली असून, दररोज सरासरी ४० लाख प्रवासीसंख्या आता ४२ लाखांवर पोहोचली आहे.
अलीकडेच बेस्टने तिकीट दरवाढ केली. विनावातानुकूलित बससाठी किमान भाडे पाचवरून १० रुपये, तर वातानुकूलित बसचे किमान भाडे सहावरून १२ रुपये करण्यात आले. अल्प व मध्यम अंतरासाठी बस प्रवास महाग झाल्याने मोठ्या संख्येने प्रवाशांनी रेल्वेची वाट धरली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांच्या उपनगरीय मार्गांवर सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या तासांत प्रवाशांची प्रचंड वाढ झाली आहे. दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे स्थानकांवर प्रवाशांचा ओघ अधिक आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक ठरत असून, येथून दररोज सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यानंतर कुर्ला सहा लाख, ठाणे स्थानकावर सुमारे पाच लाख आणि कल्याण स्थानकावर चार लाख प्रवाशांची नोंद झाली आहे.
----
प्रवासी सुविधा वाढवण्यावर भर
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, तिकीट आणि पासविक्रीत झालेली वाढ ही प्रवासीसंख्येतील बदलाचे द्योतक आहे. अधिक प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे लावणे, काही सेवांच्या फेऱ्या वाढविणे तसेच तिकीट खिडक्या वाढविण्याचा विचार सुरू आहे. गर्दी नियंत्रणासाठी प्लॅटफॉर्मवरील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याची योजनाही आखण्याचे विचार सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Life Threat: ‘’माझ्या जीवाला धोका…’’ ; राहुल गांधींकडून पुणे कोर्टात अर्ज अन् महात्मा गांधींच्या हत्येचाही उल्लेख!

स्वातंत्र्यदिनी केडीएमसी हद्दीत चिकन-मटण पार्टी रंगणार, जितेंद्र आव्हाड पार्टीचे नेतृत्व करणार; नवा वाद पेटणार?

Bank Charges: खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १५ ऑगस्टपासून व्यवहारांवर शुल्क आकारणार, IMPS शुल्कात मोठा बदल

Dharashiv Crime : धाराशिव हादरले! भरदिवसा रक्तरंजित सूड; पती-पत्नीचा कोयत्याने निघृण खून

पैशासाठी IPL विजेत्या KKR ची साथ सोडायला निघालेला भारतीय खेळाडू! धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT