विरार, ता. १४ (बातमीदार) : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारअंतर्गत मेरा युवा भारत, पालघर आयोजित ‘एक पेड माँ के नाम‘ कार्यक्रमांतर्गत निसर्गप्रेमी प्रतिष्ठान आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. कनिष्ठ विद्यालय, जूचंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवारी (ता. १३) रोजी जूचंद्र येथे कार्यक्रम करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केली. मुख्याध्यापक विलासराव जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते आदित्य राऊळ, कृषी अधिकारी, पंचायत समिती, वसई यांनी वृक्ष संवर्धन आणि त्याचे जतन याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड आपल्या घरासमोर लावण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरणदेखील या वेळी करण्यात आले.
निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मितेश गोतरणे, द्वितीय- मानसी गोणबरे, तृतीय- दिव्या चव्हाण यांनी पटकावला. कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य शुभांगी बेंद्रे, निसर्गप्रेमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर घायाळ उपमुख्याध्यापक रंगनाथ नाडेकर ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख नीलेश गवळी व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निसर्गप्रेमी प्रतिष्ठानचे सदस्य नीलेश वाघमारे, कृष्णा गौड, चंदन यादव, प्रांजळ यादव, प्रथम संगठिया, हर्षित संगठिया, रितेश विश्वकर्मा, ब्रिजमोहन चव्हाण यांनी आपले योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंगेश मस्के यांनी केले व आभार वैजनाथ सर यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.