मुंबई

सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची दांडी

CD

सुट्टीच्या दिवशीही पर्यटकांची दांडी
वसई-विरारमधील रिसॉर्टचालक हवालदिल
प्रसाद जोशी ः सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १४ ः रक्षाबंधन सणाला तीन दिवस सलग सुट्टी असताना समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली; मात्र १५ ते १७ ऑगस्ट या तीन दिवसांच्या सुट्टीत पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे वसई-विरार परिसरातील रिसॉर्ट चालवणारे व स्थानिक व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाले आहेत. वसई तालुक्यातील हिरवागार परिसर आणि समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. मुंबई, ठाणे व आजूबाजूच्या भागातील पर्यटक येथे सहलीसाठी येतात. रक्षाबंधनाच्या सलग सुट्टीच्या वेळी बुकिंग चांगली झाली होती आणि पर्यटकांची गर्दी होती; मात्र पुढील सुट्टीच्या तीन दिवसांत बुकिंग प्रमाण अत्यल्प राहिले आहे.

कळंब, राजोडी, अर्नाळा आणि नवापूर येथे सुमारे २८० रिसॉर्ट आहेत. येथे राहण्याची व्यवस्था, स्विमिंग पूल, लहान मुलांसाठी खेळणी तसेच शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ व करमणुकीचे आयोजन केले जाते. या रिसॉर्टमुळे सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत मौजमजा व विश्रांतीची संधी उपलब्ध होते. तथापि, या सुट्टीत पर्यटकांचा अभाव दिसून येत आहे. यामुळे स्थानिक भागात पिकणाऱ्या हिरव्या भाज्या आणि मांसाहारी वस्तूंची मागणी कमी झाली असून, याचा स्थानिक व्यवसायावर व रोजगारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि शनिवारी (ता. १६) दहीहंडीचे कार्यक्रम असल्याने मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या भागांत नागरिकांनी या कार्यक्रमांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रविवारी (ता. १७) घरात राहण्याची शक्यता अधिक आहे. वसई-विरारमध्ये रिसॉर्ट व्यवसाय वाढत असला तरी व्यवसायाचा प्रश्न निर्माण होत आहे. आर्थिक चिंता वाढत असून, येत्या तीन दिवसांत स्थानिक रोजगार कमी होण्याची शक्यता आहे.

वर्षभरात चार महिने व्यवसाय होत नाही, सुट्टीतही अशीच परिस्थिती असल्याने कामगारांचे वेतन, वीजबिल आणि कर यांसाठी आर्थिक अडचणी येत आहेत. शासनाकडून अनुदान व कर सवलत मिळावी. तीन दिवस सुट्टी असताना केवळ १० ते १५ टक्के बुकिंग आहे. पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.
- रामदास मेहेर, अध्यक्ष, वसई तालुका रिसॉर्ट असोसिएशन

रक्षाबंधन सुट्टीच्या वेळी काही प्रमाणात पर्यटक आले; पण येणाऱ्या तीन दिवसांत फक्त २५ टक्के बुकिंग आहे. त्यामुळे व्यवसायावर नकारात्मक परिणाम होणार आहे.
- धीरज निजाई, व्यावसायिक

बुकिंगची सध्याची स्थिती :
कळंब : २५ टक्के
नवापूर : १५ टक्के
अर्नाळा : २० टक्के

रिसॉर्ट संख्या :
मोठे : ८०
छोटे : २००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident: नवले पुलावर का होतात अपघात? काय आहेत कारणे? आता पूल क्रॉस करण्याचीही भीती वाटते का?

Ram Mandir: राम मंदिरामुळे अयोध्येची अर्थव्यवस्था नवी उंची गाठणार; सीएम योगींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या नव्या युगाला सुरुवात

Bihar Election Result 2025 Live Updates : राघोपूरमधून तेजस्वी यादव तीन हजार मतांनी पिछाडीवर, आरजेडीला मोठा धक्का

Gold Rate Today : सोन्याच्या भावात आज मोठा बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

IND vs SA 1st Test : १३ वर्षांपूर्वी धोनीने वापरलेल्या 'त्या' प्लॅनची गिल-गंभीरकडून पुनरावृत्ती! २०१२ नंतर पहिल्यांदाच घडलं 'असं'

SCROLL FOR NEXT