मुंबई

मनसेच्या आजी-माजी कार्यकर्त्यांना दहीहंडी उत्सव करण्यास मनाई

CD

मनसेच्या आजी-माजी कार्यकर्त्यांना दहीहंडी उत्सव करण्यास मनाई
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
उच्च न्यायालयाने मागणी फेटाळताना केले स्पष्ट
सकाळ वृत्तसेवा, मुंबई,
भांडुप येथे यंदाच्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) आजी-माजी कार्यकर्त्यांना येत्या १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. १४) परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दोन्ही प्रतिवादींना दहीहंडी उत्सव एकाच ठिकाणी साजरा करण्यास मज्जाव केला.

गाढव नाका भांडुप (पूर्व) परिसरात स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची मागणी याचिकाकर्ते संदीप जळगावकर यांनी उच्च न्यायालयाकडे केली होती. सुरुवातीला भांडुप पोलिस, मुलुंड वाहतूक विभाग आणि अग्निशमन विभागाकडून परवानगी मिळाली असताना अचानक १३ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्याविरोधात जळगावकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचवेळी गाढव नाका परिसरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मिळाल्याचे हस्तक्षेप अर्जाद्वारे मनसेच्या वतीनेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याचिकाकर्त्यांनी मनसे पक्षाच्या अधिकृत दहीहंडी उत्सवाला स्वतःचा वैयक्तिक उत्सव दाखविण्याचा प्रयत्न केला असून, दहीहंडी उत्सव पक्षाच्या वतीने साजरा करण्यात येत असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने या दहीहंडीवर त्यांचा कोणताही अधिकार नसल्याचा दावा केला. दोन्ही गटांच्या वादामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस आणि पालिकेने दोघांनाही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली.

या याचिकेवर गुरुवारी न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने संबंधित विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, एकाला परवानगी देऊन दुसऱ्याला परवानगी नाकारल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परवानगी नाकारल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यांची बाजू ग्राह्य धरली. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या व्यापक जनहिताच्या दृष्टीने पोलिस विभागाने घेतलेल्या या निर्णयावर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने याचिकाकर्त्यांना परवानगी नाकारली.

काय प्रकरण

याचिकाकर्ते संदीप जळगावकर यांनी गेल्यावर्षी निवडणुकीनंतर मनसे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला. भांडुप येथे २०२२ पासून दहीहंडी उत्सव मनसे पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आला होता. जळगावकर हे विभागाध्यक्ष असल्याने त्यांच्या नावाने पोलिस आणि वाहतूक विभागाकडून परवानग्या मिळत होत्या. तर पालिकेची मुख्य परवानगी पक्षाच्या नावाने मिळत होती. यंदाच्या वर्षी जळगावकर आणि मनसे या दोघांनाही सर्व परवानग्या मिळाल्या. दोन्ही पक्षांना एकाच ठिकाणी उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळाल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आणि पेच निर्माण झाला. त्यामुळे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पालिका आणि पोलिस प्रशासनाने दोन्ही गटांना दिलेल्या परवानग्या रोखल्या. त्या निर्णयाला जळगावकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आपल्याला यामध्ये प्रतिवादी न केल्याबद्दल मनसेनेही हस्तक्षेप अर्ज केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT