पालघर प्रगतीचा महाजिल्हा बनणार
पालकमंत्री गणेश नाईक यांचे प्रतिपादन
पालघर, ता. १५ ः सर्व यंत्रणांच्या प्रयत्नांसह जनसहभागातून पालघर हा राज्यातील प्रगतीचा महाजिल्हा बनणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्वातंत्र्यदिनी केले. देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालघर जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला. त्या वेळी त्यांनी हे प्रतिपादन केले.
पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून आदिवासी कुटुंबांना रोजगार हमी योजनेद्वारे सर्वाधिक रोजगार पुरवण्यात जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे. यासह जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्याचा शाश्वत व नियोजनबद्ध असा विकास करणार असल्याचे नाईक यांनी या वेळी सांगितले. पंतप्रधान धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत लोकसहभाग मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ जूनमध्ये पालघरपासून सुरू केला गेला. या वेळी आदिवासी समाजासाठी ८० हजार कोटी रुपयांच्या योजना लोकार्पित करण्यात आल्या, ही मोठी उपलब्धी असल्याचे नाईक यांनी म्हटले. पालघर जिल्ह्यात बांबू मिशन मोहीम सुरू झाली असून आतापर्यंत १,०६३ हेक्टरवर २९ लाख ५२ हजारांच्या जवळपास बांबूरोपांची लागवड करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात बांबू लागवडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्यात दहा कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या मोहिमेत पालघर जिल्ह्यात ५० लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्री नाईक यांनी स्पष्ट केले.
...
मान्यवरांची उपस्थिती
जिल्ह्याच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासमवेत जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. भवानजी आगे पाटील, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, जिल्ह्यातील विविध अधिकारी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आदी उपस्थित होते.
...
विकासाला गती!
जिल्ह्यातील नागरिकांचे गरोदर मातांचे व बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, या दृष्टिकोनातून आरोग्य संस्थांमधून आवश्यक ती आरोग्य सेवा दिली जात आहे. कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग विशेष प्रयत्न करत आहे. कामगार विभागामार्फत विविध कामगारांना कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जात आहेत, असे पालकमंत्री नाईक यांनी सांगितले. जनकल्याणकारी योजना अमलात आणून जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन, शासन यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाला गती मिळत आहे, असे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.