श्रीवर्धन आगाराच्या ६२ जादा फेऱ्या
मुंबई, ठाणे, बोरिवली, नालासोपारा मार्गांवर प्रवाशांसाठी दिलासा
श्रीवर्धन, ता. २१ (बातमीदार) : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांमधून हजारो चाकरमानी कोकणाकडे रवाना होणार आहेत. या वाढत्या गर्दीला तोंड देण्यासाठी एसटी महामंडळाच्या श्रीवर्धन आगाराकडून यंदा एकूण ६२ जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
माहितीनुसार, २३ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाणे, बोरिवली, नालासोपारा, बोर्ली आणि बागमंडला या मार्गांवर अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत. यामध्ये २३ ऑगस्टला श्रीवर्धन-बोर्ली, नालासोपारा व बोरिवली प्रत्येकी दोन अशा सहा फेऱ्या, २६ ऑगस्टला श्रीवर्धन-मुंबई सहा फेऱ्या, २ सप्टेंबरला बागमंडला-मुंबई, श्रीवर्धन-बोर्ली व बोरिवली प्रत्येकी दोन अशा सहा फेऱ्या होतील. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ३ सप्टेंबरला तब्बल ३२ फेऱ्यांचे नियोजन आहे,
तर ४ सप्टेंबरला श्रीवर्धन-मुंबई सहा, श्रीवर्धन-बोर्ली पाच व श्रीवर्धन-बोरिवली सात अशा १८ फेऱ्या होतील. या सर्व गाड्या दिवसभरात वेगवेगळ्या वेळांना सुटणार असून, विशेषत: परतीच्या फेऱ्यांवर अधिक भर दिला जाईल. प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करावे, असे आवाहन आगाराकडून करण्यात आले आहे.
मनुष्यबळाची कमतरता
शंभरहून अधिक फेऱ्या सुरळीत पार पाडण्यासाठी २३६ चालक व वाहकांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात फक्त १६६ जण उपलब्ध आहेत. परिणामी आगाराला कमी मनुष्यबळातच सेवा सुरू ठेवावी लागत असून, गाड्या उशिरा येण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
येत्या गौरी-गणपतीसाठी जादा गाड्यांची सोय केली आहे. मागणीप्रमाणे बसेसची संख्या वाढवली जाईल. प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही सर्व तयारी केली आहे.
- मेहबूब मणियार, आगारप्रमुख, श्रीवर्धन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.