नव्याने बांधलेल्या विक्रोळीतील पुलामुळे पाणी साचण्याची समस्या
पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेची उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नव्याने विक्रोळी येथे बांधलेल्या पुलालगत पाणी भरले. त्यामुळे वाहतुकीला मोठी अडथळा निर्माण होतो. येथे तुंबणाऱ्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आले.
विक्रोळी येथील १८० कोटी रुपये खर्चून बांधलेला ४८० मीटर लांबीचा हा पूल जूनमध्ये वाहतुकीसाठी खुला केला आहे. या पुलावरून १० ते १५ मिनिटांत पूर्व-पश्चिम पोहोचता यावे, यासाठी हा पूल आहे. मात्र या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने पूल बांधला नसता तर बरे झाले असते, अशा प्रतिक्रिया वाहनचालक व्यक्त करीत आहेत.
मुसळधार पावसामुळे पुलाच्या उतरत्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले. त्या पाण्यातून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांची दमछाक झाली. नव्या पुलामुळे नव्याने उद्भवलेली समस्येने स्थानिक त्रस्त झाले आहेत.
या भागाची पालिकेच्या आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
पुलाच्या बाजूला नाला असल्याने नाल्यामध्ये प्लॅस्टिक अडकल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नाल्याचे पाणी या पुलाच्या खाली साचले. त्यामुळे वाहतुकीला निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.