गणेशोत्सव मंडळांना अनुदान द्यावे!
सार्वजनिक समन्वय समितीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर १,८०० भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजारांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाच गणेशोत्सवाचा गाभा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सरकारने विचार करावा. त्यांनाही अनुदान मिळावे, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.
मुंबईत सुमारे १० ते १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत आहेत. यापैकी अनेक मंडळे रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि शतक महोत्सव साजरा करीत आहेत. अशा मंडळांना सरकारकडून अनुदान मिळाल्यास गणेशोत्सव आणखी मोठ्या उत्साहात साजरा होऊ शकतो. मुंबईतील गणेश मंडळांनी नेहमीच सामाजिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय आपत्ती, महापूर, संकटाच्या काळात मंडळांनी आपत्ती निवारण आणि मदतकार्य केले आहे. वर्षभर आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून समाजातील विविध घटकांना मदत केली आहे. याशिवाय गणेशोत्सव काळात उभारल्या जाणाऱ्या देखाव्यांमधून मंडळे समाजप्रबोधनाचे कार्यही सातत्याने करीत आली आहेत. त्यामुळे गणेश मंडळांना अनुदानाचा लाभ मिळावा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.