मुंबई

कल्याणातील मानाचे मेळा गणपती....

CD

कल्याणातील मानाचे मेळा गणपती
सव्वाशे वर्षांपासून सुरू असलेली मेळा गणपतीची परंपरा
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : मागील चार-पाच दशकांपासून गल्लीबोळात मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवल्यानंतर दुसऱ्या वर्षी कल्याण गावातही गावकीतील विविध ज्ञातीचे गणपतीची स्थापना करून मानाच्या मेळा गणपती उत्सवाला सुरुवात झाली. सव्वाशेहून अधिक वर्षांपासून कल्याण गावकीची मेळा गणपतीची परंपरा आजही अविरतपणे अखंडित सुरू आहे. कल्याण गावकीच्या मानाच्या मेळा गणपती उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंडळाचा गणेशोत्सव असल्याने कार्यकर्त्यांना मुंबई, पुण्यातील देखावे पाहण्यासाठी जाणे शक्य नसायचे. अशा स्थितीत काही मंडळांनी एक नामी शक्कल काढली. एकादशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करून उरलेले दोन दिवस मुंबई-पुण्यातील गणेश दर्शनाला निघायचे, अशी परंपराच कल्याणमध्ये सुरू झाली. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीपासून ते एकादशीपर्यंत मेळाच्या गणपतीची स्थापना करून उत्सव साजरा केला जातो व या गणपतीचे एकादशीला मोठ्या उत्साहात विसर्जन केले जाते. मंडळांच्या या गणरायांना मेळ्याचे गणपती असे संबोधले जाऊ लागले. प्रत्येक गणपतीचा मान ठरलेला आहे, मात्र काळाच्या ओघात अनेक मंडळे या मेळ्यातून बाहेर पडली असली तरी आजही १२ मंडळांचा मेळा गणेशोत्सवात समाविष्ट आहे. हे सर्व गणपती आपापल्या मानाप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात.

१२ मंडळांचा समावेश
आचार्य अत्रे रंगमंदिरापासून निघणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीत तेली मंडळी, वैश्य समाज मंडळ, धनगर समाज मंडळ, शाहू छत्रपती गणेशोत्सव मंडळ, नवजीवन गणेशोत्सव मंडळ, उदय गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ, बच्चीराम तेली गणेश मंडळ, कुंभारवाडा गणेश मंडळ, गुजराती समाज मंडळ, हनुमान प्रासादिक गणेशोत्सव मंडळ, गजानन प्रासादिक मंडळ या १२ गणपतींचा सहभाग असतो. या गणपतींच्या मिरवणुका ढोल-ताशांच्या गजरात ठरवून दिलेल्या मार्गाने गणेश घाटावर मार्गस्थ होतात. शेवटच्या गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालते.

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मेळा गणपती
पुणे आणि कल्याण या दोन्ही शहरांना जुळी शहरे म्हणून ओळखली जातात. सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात एकमेकांच्या जवळपास आहेत. १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या वर्षी १८९५ मध्ये कल्याण गावातील सुभेदार वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्याकाळी देशप्रेमाने भारलेल्या तरुणांची एवढी मोठी संख्या कल्याणात होती. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मेळ्याच्या स्वरूपात सुरू केलेल्या या उत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT