वसई, ता. ३१ (बातमीदार) : गणरायाच्या पाठोपाठ आज (ता. ३१) गौराईचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करीत गौरी आणण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात रस्त्यावर उतरल्या होत्या. कोळीवाडे, तसेच शहर, ग्रामीण भागात उत्साहाला उधाण आल्याचे पाहावयास मिळाले.
वसई तालुक्यातील पाचूबंदर, अर्नाळा, नवापूर, कळंब, निर्मळ, राजोडी, खोचिवडे यांसह गावागावात गौरींचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या वेळी महिलांनी साजशृंगार केला होता, तर पारंपरिक गीते गात मिरवणूक काढण्यात आल्याने भक्तीची आस दिसून येत होती. वसईच्या पश्चिम भागातील दिवाणमान व विरार येथील अर्नाळा गावातील महिला या १५ किमी पायी चालत गौरी घेऊन आल्या. त्यानंतर पूजा, महाआरती करण्यात आली. वसईच्या पूर्व पट्टी भागातील कामण, जूचंद्र, चंद्र पाडा, पोमण, नागले आदी भागांत गौराईसाठी घरीच अत्यंत आकर्षक अशी आरास तयार करण्यात आली आहे. गौरीमूर्तीला साडी-चोळी, नथ यासह साजशृंगार करण्यात आला आहे.
रविवारी गौरीचे आगमन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा-अर्चा करून माहेरवाशिणीचे लाड पुरवले जाणार आहेत. त्यासाठी महिला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून नैवेद्य दाखवणार आहेत. गौरी सणाला रात्रभर महिला जागरण करतात. या वेळी फुगडी, तसेच गाणी गाणे असा कार्यक्रम रंगतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.