अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) : शहरातील रेल्वेस्थानक परिसरात गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट वाढला आहे. फेरीवाल्यांचे कपडे आणि इतर वस्तू चोरून नेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळी या टोळ्या पदपथांवरील विक्रेत्यांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होत आहे.
सततच्या चोरीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या फेरीवाल्यांनी अंबरनाथ पोलिसांना चोरट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ (पश्चिम) येथील लव्हली झेरॉक्समागील एका गोदामाचे मागील दार तोडून चोरट्यांनी चार फेरीवाल्यांचे हजारो रुपयांचे कपडे, बेल्ट आणि इतर साहित्य लंपास केले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. स्टेशनसारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा चोऱ्या घडत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन पोलिसांनी उपद्रवी गर्दुल्ल्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिस शेख यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.