मुंबई

प्रभागरचनेविरोधात शुन्य हरकती

CD

प्रभागरचनेविरोधात शून्य हरकती
नगरपालिकेकडून प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे
उरण, ता. १३ (वार्ताहर)ः उरण नगर परिषदेच्या प्रभाग संख्या वाढल्याने सदस्य संख्या वाढली आहे. प्रारूप आराखड्यानंतर उरण नगर परिषदेमध्ये एकही हरकत राजकीय पक्षांकडून किंवा नागरिकांकडून आली नसल्याने अंतिम रचनेचा प्रस्ताव नगरपालिकेने शासनाकडे पाठवला आहे.
उरण नगरपालिकेची मुदत संपून तीन वर्षांपासून कारभार प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. १७ हजारांहून अधिक मतदारांची संख्या असलेल्या उरण नगर परिषदमध्ये नऊ प्रभागांतून १८ सदस्य व नगराध्यक्षपदासाठी निवड झाली होती. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण नगरपालिकेच्या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नवीन प्रभागरचनेनंतर प्रभागाची संख्या १० झाली असून नगराध्यक्ष वगळून सदस्य संख्या २१ वर गेली आहे. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार केल्यानंतर हरकती व तक्रारी दाखल करण्याची सूचना केली होती. तशा प्रकारचे फलकही लावण्यात आले; मात्र निर्धारित मुदतीत राजकीय पक्ष, मतदार तसेच नागरिकांकडून हरकत नोंदवली गेली नसल्याची माहिती उरण नगरपालिकेने दिले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रभागरचनेविरोधात शून्य हरकती असलेले उरण नगर परिषद एकमेव ठरली आहे.
----------------------------------
प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार केल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाने, नागरिकांकडून हरकत आलेली नाही. उरण नगरपालिकेचा अंतिम प्रभागरचनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे.
- समीर जाधव, मुख्याधिकारी, उरण नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवले पत्र

SCROLL FOR NEXT