
Asia Cup 2025, India vs Pakistan
ESakal
आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच भारत-पाकिस्तान सामन्यावरून गोंधळ सुरू आहे. आशिया कपमध्ये दोन्ही संघांची 'महाभिडत' १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना रद्द करण्यासाठी संपूर्ण भारतात मोहीम सुरू झाली आहे. राजकीय पक्षही याला विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत, हा सामना रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) हातात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.