रस्त्याअभावी मृतदेह डोलीतून नेण्याची वेळ
जव्हार, ता. १७ (बातमीदार) : जव्हार तालुक्यातील चांभारशेतपैकी नारनोली गावात रस्त्याअभावी एका तरुणाचा मृतदेह डोलीतून नेण्याची हृदयद्रावक घटना घडली. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
महेंद्र जाधव (वय ३८) नावाचा तरुण रोजगारानिमित्त वसई येथे गेला होता. प्रकृती खालावल्यामुळे शनिवारी (ता. १३) त्याला जव्हार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे पार्थिव रुग्णवाहिकेतून भुसारपाड्यापर्यंत आणले गेले. परंतु गावाकडे रस्ता नसल्यामुळे तेथून पुढे सुमारे दोन किलोमीटर मृतदेह डोलीतून वाहून न्यावा लागला.
या घटनेमुळे स्थानिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मृत्यूनंतरही एवढी अवहेलना सहन करावी लागत असेल तर ‘डिजिटल इंडिया’चा ढोल वाजवून त्याचा उपयोग काय, अशी टीका माजी आमदार सुनील भुसारा यांनी केली. आता मृतदेह डोलीतून गेला, उद्या गरोदर मातेला अशाच डोलीतून दवाखान्यात न्यावे लागले, तर पुन्हा हीच परिस्थिती अनुभवायची का की रस्ता होऊन आम्हालाही सुखसुविधा मिळेल, असे प्रश्न अनुत्तरित असल्याचे येथील सरपंच दिनेश जाधव यांनी सांगितले.
चांभारशेतपैकी नारनोली गावात रस्ता नसल्याने मृतदेह डोलीद्वारे घरापर्यंत देण्यात आला ही बाब समजली. त्यानुसार रस्ता तयार करण्यासाठी संबंधित विभागाला कळविले आहे.
- लता धोत्रे, तहसीलदार, जव्हार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.