मुंबई

दिबांच्या नावासाठीच्या लढ्यात बाळ्यामामा कुठे होते?

CD

दिबांच्या नावासाठीच्या लढ्यात बाळ्यामामा कुठे होते?
रामशेठ ठाकूर यांचा सवाल

पनवेल, ता. ३० : ‘‘लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त स्थानिकांचे दैवत आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव द्यावे, या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला आहे. सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांत असंख्य आंदोलने केली. या लढ्याला जनतेचा व्यापक पाठिंबा असताना अचानक खासदार सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची घुसखोरी सुरू झाली आहे. हा लढा सुरू असताना बाळ्यामामा म्हात्रे कुठे होते,’’ असा सवाल उपस्थित करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
सुरेश म्हात्रे आमच्या विभागाचे खासदारच नाहीत. त्यामुळे त्यांना या लढ्याचे महत्त्व व इतिहास माहिती नाही. फक्त श्रेय घेण्यासाठी आणि शो-शायनिंगसाठी ते पुढे येत आहेत, अशी रोखठोक प्रतिक्रिया लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विमानतळाला दिबा साहेबांचेच नाव मिळाला पाहिजे, ही आग्रही भूमिका आहे आणि त्यासाठी समिती दक्ष असल्याचेही त्यांनी या वेळी अधोरेखित केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख उपस्थित होते.
...
३ ऑक्टोबरला बैठक
पत्रकारांशी संवाद साधताना रामशेठ ठाकूर यांनी म्हटले आहे, की सुरेश म्हात्रे यांनी ६ ऑक्टोबरला मोर्चा काढण्याची घोषणा केली असली तरी त्यासंदर्भातील बैठकीला लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचा कुणीही पदाधिकारी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे त्या बैठकीला मी उपस्थित नसतानाही माझ्या नावाचा उल्लेख वर्तमानपत्रात करण्यात आला. भूमिपुत्रांना फसविण्याचा केविलवाणा प्रयत्न होऊ नये. समितीच्या बाहेरून अशा हालचाली होणे दुर्दैवी आहे. ३ ऑक्टोबरला नवी मुंबईत समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीतच पुढील वाटचालीचा निर्णय घेतला जाणार आहे. ‘समितीचा एकमुखी निर्णय हाच आमचा मार्ग असेल आणि भूमिपुत्रांच्या इच्छेनुसारच आम्ही पुढे पाऊल टाकू,’ असेही त्यांनी अधोरेखित केले.
...
आमचा नेत्यांवर भरवसा
दिबांच्या नावाबाबत सुरळीतपणे काम सुरू असताना अचानकपणे खासदार बाळ्यामामा म्हात्रे हे आमच्या समितीमध्ये घुसायला पाहात आहेत. ते संघटनेत आलेले नाहीत. सदस्य, पदाधिकारी नाहीत. कशाही प्रकारे त्यांचा प्रकल्पग्रस्त समितीशी संबंध नाही. त्यांची समिती असेल तर भिवंडीपुरती. पनवेल, उरण, नवी मुंबई, रायगडशी त्यांचा काडीचाही संबंध नाही, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकारमधील मंत्री यांनी विमानाचे टेकऑफ होईल तेव्हा दिबांचे नाव जाहीर होईल, असे स्पष्टपणे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे नेते असून, त्यांच्यावर आमचा भरवसा आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025: भारतीय संघाची विजयाने दणक्यात सुरुवात! दीप्ती शर्मा - स्नेह राणाची फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही कमाल

भीमा नदीतील पाण्यामुळे सीनेचा पूर ओसरेना! सोलापूर-विजयपूर महामार्ग आजही बंदच राहणार; उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

मोठी बातमी! ‘मकोका’ची कारवाई टाळण्यासाठी मागितली ६५ लाखांची खंडणी! कोल्हापुरातील सहायक फौजदारासह 5 जणांवर अकलूज पोलिसांत गुन्हा, दोघे अटकेत

Attacked on Ex Minister in Jail : खळबळजनक! माजी मंत्र्यावर तुरुंगात जीवघेणा हल्ला; डोक्याला गंभीर इजा!

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राची आकांशा नित्तूरे दुसऱ्या फेरीत; दिव्या भारद्वाजचीही आगेकूच

SCROLL FOR NEXT