वज्रेश्वरी, ता. ६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी येथे काही दिवसांपासून एका नामांकित कंपनीची नेटवर्क सेवा अचानक ठप्प झाली आहे. या भागातील वापरकर्त्यांना कोणालाही लवकर संपर्क साधता येत नाहीत. मोबाईल इंटरनेटही व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी येथील मोबाईल वापरकर्त्यांना नेटवर्क मिळत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक त्रस्त नागरिक समाज माध्यमांवर तक्रारी करत पोस्टद्वारे आपली समस्या मांडत आहेत. तर काही एकमेकांना विचारत आहेत की त्यांचे नेटवर्कही बंद आहे का? याबरोबरच वाय-फाय व ब्रॉडबँड सेवाही प्रभावित झाल्याचे अनेकांनी सांगितले आहे. या तांत्रिक अडचणीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीकडूनही याबाबत कोणतेही औपचारिक स्पष्टीकरण आलेले नाही. तरीही कस्टमर केअरकडून ही समस्या लवकरच दूर होईल आणि नेटवर्क पुन्हा सुरळीत चालू होईल, असा दावा करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.