वीजबिल कमी करण्याच्या आश्वासनाला हरताळ!
काँग्रेसची फडणवीसांवर टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : राज्यातील जनतेचे वीजबिल पुढील पाच वर्षांत कमी केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीरपणे सांगितले होते; पण मुख्यमंत्र्यांनीच आपल्या शब्दाला बगल देत इंधन समायोजन आकाराच्या (एफएसी) माध्यमातून वीज महाग केली आहे. दिवाळीच्या तोंडावर स्पटेंबर महिन्यात केलेली ही वीजदरवाढ सर्वसामान्यांवर टाकलेला बोजा आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
वीजदर स्वस्त करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन हा जुमला ठरला असून, इंधन समायोजनाच्या नावाखाली भाजप महायुती सरकारने जनतेला वीज महागाईचा शॉक दिला आहे. या दरवाढीमुळे १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकालाही या दरवाढीचा फटका बसणार असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे. मोदी सरकारने गब्बर सिंग टॅक्स लादून आठ वर्षे लूट केली व दुसरीकडे जीएसटी कमी केल्याचा आव आणत बचत उत्सव साजरा करण्याचा ढोल पिटता आणि जनतेच्या डोक्यावर सणासुदीच्या काळातच महागाईचे ओझेही टाकता हा कसला बचत उत्सव, असा प्रश्नही अतुल लोंढे यांनी विचारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.