मुंबई

संचमान्यतेच्या अखेरच्या मुदतीनंतर ८ लाख ८ हजार विद्यार्थी ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये

CD

संचमान्यतेच्या अखेरच्या मुदतीनंतर आठ लाख आठ हजार विद्यार्थी ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये
विद्यार्थी शाळेत हजर, मात्र नोंदणीच नसल्याने गोंधळ; पुन्हा मुदतवाढ देण्याच्या पर्यायांवर निर्णय
मुंबई, ता. २३ ः राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संचमान्यतेनुसार माहिती भरण्याची मुदत सोमवारी (ता. २०) संपली. या मुदतीनंतर राज्यातील एक लाख आठ हजार २०७ शाळांमध्ये तब्बल आठ लाख आठ हजार ६४९ विद्यार्थ्यी ‘ड्रॉपबॉक्स’ दिसून आले आहेत. हे विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित असले तरी त्यांची नोंदणी होऊ शकली नसल्याने त्यांना विभागाकडून ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये टाकण्यात आले असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यातील शाळांमध्ये प्रत्येक शाळेत किती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असावेत, याची संख्या संचमान्यता विद्यार्थ्यांच्या उपस्थिती, गैरहजेरी, नवीन प्रवेश, शाळा सोडलेली मुले आदींची माहिती संचमान्यतेत भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मागील तीन महिन्यांपासून कार्यक्रम आखला होता. यासाठी शिक्षक संघटना, शिक्षक प्रतिनिधींच्या दबावांमुळे अनेकदा ही माहिती भरण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली होती; मात्र अखेरच्या मुदतीनंतरही आठ लाख आठ हजार ६४९ मुलांच्या नोंदणीसाठीचा ताळमेळ विभागाकडे नसल्याने ही मुले शाळेत उपस्थित आहेत की सरकारी, अनुदानित शाळांमधून ती खासगी शाळांमध्ये वर्ग झाली, याविषयी विभागाकडेच स्पष्टता नाही. येत्या काळात या सुधारित संचमान्यता करण्यासाठी विभागाला पाऊल उचलावे लागेल, अशी शक्यता शिक्षण विभागातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
शिक्षण विभागाच्या अहवालातील माहितीनुसार यावर्षी दोन कोटी १४ लाख ६८ हजार ३३४ विद्यार्थ्यांपैकी दोन कोटी १० लाख ७३ हजार ५०२ विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजे तीन लाख ९४ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप होणे बाकी असल्याचे या अहवालातून समोर आले. तसेच आठ लाख आठ हजार ६४९ विद्यार्थी अद्याप ड्रॉपबॉक्स म्हणजे शाळेत ऑफलाइन हजर मात्र ऑनलाइन गैरहजर दिसत आहेत.

शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्‍यता
राज्यातील शाळांमध्ये आठ लाख आठ हजार ६४९ विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये दिसून आल्याने ही संख्या येत्या काळात कमी न झाल्यास मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, संचमान्यतेच्या नवीन नोंदणीमध्ये राज्यातील १२२ शाळांध्ये शून्य ते १२ विद्यार्थ्यांची संख्या उरल्याचेही समोर आले आहे. यात आठ शाळांमध्ये शून्य विद्यार्थी, आठ शाळांमध्ये प्रत्येकी केवळ एक विद्यार्थी, दोन शाळांमध्ये प्रत्येकी दोन आणि तीन शाळांमध्ये प्रत्येकी तीनच विद्यार्थ्यांचे प्रवेश दिसून आले आहेत.

मुंबईत विद्यार्थ्यांची संख्या घटली
राज्यातील सरकारी, अनुदनित शाळांपैकी मुंबई ‍विभागात पाच हजार १२, त्याखालोखाल सातारा दोन हजार २२२, भंडारा दोन हजार ९४, सिंधुदुर्ग दोन हजार ९११ आणि रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार ९१८ विद्यार्थ्यांची संख्या घटली असल्याचेही ‍दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT