दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात
बी. के. बिर्ला महाविद्यालयात आयोजन ः देशातील ६० हून अधिक संशोधकांचे संशोधनपर लेख सादर
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : बी. के. बिर्ला महाविद्यालय येथे विद्यानिवास मिश्र आणि गोपालदास नीरज यांच्या साहित्यामधील राष्ट्रीय चेतना व सामाजिक-सांस्कृतिक बोध या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा कार्यक्रम पार पडला. महाविद्यालय आयसीएसएसआर, दिल्ली व राज्य हिंदी साहित्य अकादमी आणि अखिल भारतीय साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन यूजीसीचे माजी उपाध्यक्ष प्रा. डी. के. श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा. चितरंजन मिश्र, के. के. बिर्ला फाउंडेशनचे संचालक प्रा. सुरेश ऋतुपर्ण, प्रसिद्ध निबंधकार श्रीराम परिहार, राज्य हिंदी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष प्रा. शीतलाप्रसाद दुबे, प्रा. करुणाशंकर उपाध्याय, प्रा. नरेंद्र मिश्र, प्रा. शैलेंद्र शर्मा, प्रा. सतीश पांडेय, प्रा. हूबनाथ, उपप्राचार्य डॉ. हरीश दुबे, डॉ. महादेव यादव, प्रा. मिथिलेश शर्मा, प्रा. मनप्रीत कौर, प्रा. वंदना शर्मा, डॉ. दिनेश प्रताप सिंह, प्रवीण देशमुख, डॉ. प्रेमलता मिश्र, डॉ. प्रदीप जटाल, प्रा. संतोष मोटवानी, प्रा. मनीष मिश्र, प्रा. वेदप्रकाश दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाघे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांनी सर्व आमंत्रितांचे स्वागत केले. हा कार्यक्रम प्रसिद्ध हिंदी निबंधकार विद्यानिवास मिश्र आणि कवी-गीतकार गोपालदास नीरज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला होता. सहा सत्रांमध्ये विभागलेल्या या परिसंवादात देशातील विविध राज्यांमधून आलेल्या साठहून अधिक हिंदी संशोधकांनी आपल्या संशोधन लेखांचे सादरीकरण केले. या प्रसंगी प्रा. चितरंजन मिश्र यांनी विद्यानिवास मिश्र यांच्या साहित्यामध्ये भारतीय परंपरा, लोकसंस्कृती आणि मानवी मूल्यांची जोपासणूक याविषयी सविस्तर विवेचन केले. त्यामध्ये त्यांनी मिश्र यांचे लेखन हे भारतीय जीवनदृष्टीकोनाचे जिवंत दस्तावेज आहे, यात भाषेच्या माध्यमातून राष्ट्रीय आत्म्याचा शोध दिसतो. डॉ. श्रीराम परिहार यांनी मिश्र यांचे निबंध भारतीय समाजाची आत्मा असल्याचे सांगितले. त्यांच्या मते गोपालदास नीरज यांच्या कवितांमध्ये रूमानी सौंदर्यासोबतच राष्ट्रप्रेम व सामाजिक जागरूकतेची भावना आहे, असे प्रतिपादन केले.
प्रा. सुरेश ऋतुपर्ण यांनी नीरज यांचे साहित्य सामान्य लोकांच्या मनाशी नाते जोडणारे असल्याचे नमूद केले. नीरजांचा काव्यप्रवाह केवळ भावनांचा ओघ नसून देश व समाजातील बदलत्या संवेदनशीलतेचे सजीव प्रतिबिंब आहे. प्रा. शैलेंद्र शर्मा यांनी आपल्या संशोधनात नीरज आणि विद्यानिवास मिश्र यांचे साहित्य हे तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. भाषेची सहजता, भावनांची खोली आणि राष्ट्रनिष्ठा या तिन्हींचा अद्भुत संगम या दोन्ही साहित्यिकांच्या लेखनात पदोपदी आढळतो. प्रा. नरेंद्र मिश्र यांनीही या दोन्ही साहित्यिकांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. या परिसंवादाच्या आयोजनासाठी हिंदी विभागप्रमुख बालकवि लक्ष्मण सुरंजे, डॉ. अर्चना सिंह, डॉ. धीरज शेखावत, डॉ. प्रतिभा गाढे, डॉ. भरत बागुल आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.