कोंडीविरोधात ‘मशाल मोर्चा’
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घोडबंदरवासीय संतप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : घोडबंदर मार्गावरील वाढत्या आणि जीवघेण्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या नागरिकांनी अखेर प्रशासनाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कोंडी आणि अपघातांत जीव गमावलेल्या रहिवाशांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच संबंधित विभागांना जागे करण्यासाठी शनिवारी (ता. २९) संध्याकाळी साडेसहा वाजता ‘मशाल मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. मार्गावर अवजड वाहनांची सततची वर्दळ, मेट्रोचे सुरू असलेले काम, मुख्य आणि सेवा रस्त्यांच्या जोडणीतील दिरंगाईमुळे अरुंद झालेले रस्ते ही कोंडीची मुख्य कारणे आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था आणि पावसाळ्यात पडणारे खोल खड्डे यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे येणारी दुरुस्तीची जबाबदारी दरवर्षीप्रमाणे ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिकेवर आहे. रस्त्याचे औपचारिक हस्तांतरण या दोन प्राधिकरणांकडे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिरा-भाईंदर महापालिकेकडे ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, ठाणे महापालिकेची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. कोंडी सोडवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांसाठी स्वतंत्र ‘पिवळी मार्गिका’ सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यानुसार अवजड वाहने याच मार्गिकेतून धावतील. यामुळे इतर वाहनांसाठीची कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.
निषेध नव्हे, श्रद्धांजली
अधिकाऱ्यांकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या भावना, वेदना आणि संताप व्यक्त करण्यासाठी मशाल मोर्चा काढला जात आहे. परंतु हा फक्त निषेध नव्हे, तर अपघातग्रस्तांना श्रद्धांजलीही आहे, असे आयोजक जया यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.