सरपंच संघटनेच्या आंदोलनाला यश
ठक्कर बाप्पा योजनेबाबत पालकमंत्र्यांसोबत बैठक निश्चित
जव्हार, ता. ३१ (बातमीदार) : ठक्कर बाप्पा योजनेचा विकास निधी लोकसंख्येच्या प्रमाणात मिळावा, या मागणीसाठी जव्हार तालुका सरपंच संघटनेने पुकारलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी ठरले आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने याप्रश्नी तातडीने हालचाली सुरू केल्या असून, लवकरच मंत्रालयात विशेष बैठक होणार आहे.
जव्हार, मोखाडा, विक्रमगड व डहाणू येथील सरपंचांनी निधी वितरणातील असमानतेविरोधात सोमवारपासून (ता. २९) उपोषण सुरू केले होते. मंगळवारी (ता. ३०) ''कामबंद'' आणि ''अन्नत्याग'' करत आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. या आंदोलनास विविध आदिवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला होता. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार, ५ जानेवारी रोजी प्रकल्प स्तरावर चर्चा होईल, तर त्यानंतर मंत्रालयात पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सरपंच प्रतिनिधींची संयुक्त बैठक होईल. या सकारात्मक चर्चेच्या आश्वासनानंतर सरपंच संघटनेने आपले उपोषण मंगळवारी रात्री तूर्तास स्थगित केले आहे.
दरम्यान, "बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास २० तारखेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सरपंच संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.