कल्याण (बातमीदार) : पूर्वेकडील आनंदवाडी परिसरात रिक्षा बाजूला घेण्याच्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात होऊन सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात नवाज शेख हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोरांनी त्याच्या आईलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.