Shivsena BJP 
मुंबई

युतीचे बळ एका जागेने वाढणार

सकाळवृत्तसेवा

मुंबई - माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या ७ जून रोजी मतदान होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना युतीचे विधान परिषदेत एका जागेने बळ वाढणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी सभापती देशमुख यांचा विधान परिषद सदस्यपदाचा कालावधी २०२० पर्यंत होता. मात्र त्यांच्या निधनाने ही निवडणूक होत आहे.

विधानसभा सदस्यांच्या मतदानातून या जागेवरील सदस्याची निवड होत आहे. यामुळे शिवसेना- भाजपच्या सध्याच्या संख्याबळात एका जागेने भर पडण्याची शक्‍यता आहे. शिवसेना आणि भाजप युतीचे बळ हे विरोधी बाकांवरील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीपेक्षा मोठ्या संख्येने जास्त आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोधदेखील होण्याची शक्‍यता आहे. 

सध्या विधानसभेत भाजप - १२३, शिवसेना - ६३, काँग्रेस - ४२ , राष्ट्रवादी काँग्रेस - ४० असे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंत डोळस यांचे अलीकडे निधन झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिक्‍त झाली आहे. भाजप- शिवसेनेचे एकत्रित बळ १८६ होते, तर विरोधकांचे बळ ८२ इतके आहे. त्यामुळे युतीसाठी ही जागा जिंकणे अवघड नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT