मुंबई

Vidhan Sabha 2019 : मुंबईतील नेते, उमेदवार चिंतेत.. काय झालंय मुंबईत ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई,ता.21ः सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. मात्र, मतदारांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. मुंबईत रविवार पर्यंत ढगाळ वातावरण आणि रिमझीम पाऊस असतांना सोमवारी सकाळ पासूनच ऊन पडायला लागली, त्यामूळे दुपारी 3 वाजेपर्यंत मतदारांना घराबाहेर निघत नसल्याने मुंबईतील नेते चिंताग्रस्त झाले असून कार्यकर्त्यांची मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी धावाधाव दिसून येत आहे. 

मुंबईतील मतदार बहुतेकवेळी सकाळीच मतदान करून कामावर किंवा कुटूंबासहीत फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. मात्र यावेळी असे कोणतेही नियोजन मतदारांचे दिसून येत नाही. सकाळ पासूनच मतदानासाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 26 टक्के मतदानाची नोंद झाली असल्याने, नेत्यांमध्येही आता चिंता वाढली आहे. 

मुंबईत सकाळीच खरतर बॉलीवूड कलाकार घराबाहेर पडलेले पहायला मिळालेत. अशातच सर्व मोठे नेतेमंडळी देखील घराबाहेर पडलेले आपल्याला पहायला मिळालं. मात्र अशातच प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना मतदानासाठी नेण्याचा प्रयत्न करत असतांनाही सध्या पाहायला मिळतंय. सध्या मुंबईत मतदारांना बूथ पर्यंत आणायला कार्यकर्ते आणि नेते मंडळींची धावाधाव दिसून येत आहे.

Webtitle : vidhan sabha 2019 low turnout of voters in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT