मुंबई

जलयुक्त शिवार शेतकर्‍यांसाठी संजीवनीच! कॅगच्या अहवालावर आमदार आशिष शेलार यांचे प्रश्नचिन्ह

विनोद राऊत

मुंबई : राज्यात जलयुक्त शिवारची केवळ 0.17 टक्के कामे आणि तीदेखील ठराविक भागात अभ्यासून संपूर्ण राज्यात यशस्वी  आणि शेतकर्‍यांसाठी संजीवनी ठरलेल्या या योजनेचे मूल्यमापन करणे चुकीचे आहे. त्यामुळे या योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येऊ शकत नाही, असे म्हणत भाजप नेते अॅड आशीष शेलार यांनी कॅगच्या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज्यात जलयुक्त शिवारची एकूण 6,41,560 कामे झाली. त्यापैकी कॅगने तपासलेली कामे केवळ 1128 आहेत. म्हणजेच केवळ 0.17 टक्के कामांवरून संपूर्ण जलयुक्त शिवारचे मूल्यमापन विश्वासार्ह कसे ठरेल, असा सवाल शेलार यांनी केला आहे.  याचाच अर्थ 99.83 टक्के कामे तपासलीच नाहीत. 22,589 गावांमध्ये हि कामे झाली. कॅगने केवळ 120 गावांमधील कामे तपासली. याचा अर्थ केवळ 0.53 टक्के गावेच तपासली. 99.47 टक्के गावांमध्ये न जाताच तयार केलेला अहवाल वस्तुस्थितीदर्शक कसा मानायचा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
कॅगच्या अहवालात जलयुक्त शिवार योजनेमुळे कमी साठवण क्षमता तयार झाल्याचे म्हटले आहे. मुळात वाहून जाणारे सर्व पाणी अडवणे हा उद्देश नव्हता. तर त्या गावाची पाण्याची आवश्यक गरज भागवणे आणि ती गाव जलपरिपूर्ण करणे हा उद्देश होता, असे शेलार यांनी म्हटले आहे.  अहवालात 83 पैकी 37 गावांमध्ये नियोजनापेक्षा कमी साठवण क्षमता निर्माण झाल्याचे म्हटले आहे. पण, 83पैकी केवळ 17 गावांमध्येच टँकर्सची गरज भासली. याचा अर्थ अभियानामुळे 80 टक्के गावांमध्ये टँकर्सची गरज भासली नाही, हे सिद्ध होत असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. 

भ्रष्टाचाराचा आरोप नाही!
कॅगच्या अहवालात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. कामे 98 टक्के पूर्ण झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. उलट या योजनेमुळे पिकांची लागवड आणि क्षेत्र वाढले. हे या अभियानाचेच यश आहे. कॅगच्या अनेक शिफारसी  सुधारणात्मक आहे. याचाच अर्थ हे अभियान यापुढेही सुरू रहावे, अशी कॅगची इच्छा आहे. ठाकरे सरकारने विकासाच्या योजनांना स्थगिती देण्याऐवजी या शिफारसी अंमलात आणाव्यात, असेही आशीष शेलार यांनी म्हटले आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT