File Photo 
मुंबई

आम्ही आजही तुमच्या सोबत

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : नागरीकत्व सुधारणा कायद्याबाबत अद्यापही सुस्पष्टता नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या बांधवांनी घाबरविण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात त्या अनुषगांने डिटेन्शन सेंटरही उभारु देणार नसल्याचे राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवाय इतर मंडळी मुस्लीम बांधवांना शिवसेनेच्या जवळ जाऊ नका असे सांगत होती. मात्र, जो पर्यंत तुम्ही जवळ येणार नाहीत, तो पर्यंत शिवसेना काय आहे, हे तुम्हाला समजणार कसे असेही त्यांनी यावेळी सांगत, आम्ही तुमच्या सोबत होतो आणि आजही आहोत असे स्पष्ट केले.

नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठाण्यातील मुस्लीम बांधव हे येत्या काही दिवसात मोर्चा काढणार आहेत. परंतु या मोर्चाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिंदे यांच्या मध्यस्तीने शनिवारी ठाण्यात रात्री एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शिंदे यांनी कोणालाही येथे घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे सांगितले. या राज्यात कोणत्याही धर्माच्या, जातीच्या व्यक्तीला भय वाटणार नाही, असा निर्णय करून हे सरकार बनले आहे. त्यामुळे ज्या दिवशी या कायदा मंजुर करण्यात आला, त्याच दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या लोकांना त्रस होणार नाही, याचे आश्वासन दिले आहे.

तसेच या संदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात केसही सुरु आहे, त्यामुळे कोणीही घाबरुन जाण्याची गरज नाही. या उलट राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली असल्याने त्यांच्याकडून उकसवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे कोणीही अशा अफवांवर विश्वास न ठेवता शांततेच्या मार्गाने आपली मते व्यक्त करावीत.

संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न 
आधी काही जण मुस्लमानांना शिवसेनेच्या जवळ जाऊ नका म्हणून घाबरवत होते. मात्र जो पर्यंत तुम्ही जवळ येणार नाही तो र्पयत तुम्हाला शिवसेना काय आहे, हे समजणार कसे असेही त्यांनी सांगितले. जेव्हा लोकांच्या हिताची गोष्ट असते तेव्हा मी कोणाचं ऐकत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आता देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे, कोणत्याही धर्माच्या लोकांना त्रास होणार नाही, गृहमंत्री म्हणूनही मी तुम्हाला तेच आश्वासन देत असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु काही लोक महाविकास आघडीत बिघाडी कशी होईल याचा प्रयत्न करीत असून सामाजिक संतुलन बिघडविण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे सांगत याला घाबरण्याची काहीच गरज नसून राज्यात साधे एक डिटेन्शन सेंटरही उभारु देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT