Mumbai
Mumbai  sakal
मुंबई

ठाण्यातील गटई कामगारांच्या समस्या सोडविणार- बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे शहरातील गटई कामगारांच्या समस्या सोडविण्याबाबत आपले महापालिका आयुक्तांशी बोलणे झालेले आहे. या संदर्भात आगामी महिनाभरात बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.

ठाण्यात एका कार्यक्रमासाठी बच्चू कडू आले होते. या वेळी गटई चर्मकार कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गटई कामगार, आदिवासी, तुर्फेपाडा येथील झोपडपट्टीवासीयांनी राज्यमंत्री कडू यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी हे आश्वासन दिले. संजीव जयस्वाल पालिका आयुक्त असताना ठाण्यातील दिव्यांगांच्या स्टॉलचा आणि घरांचा प्रश्न आम्ही मार्गी लावला होता.

२५ ते ३० टक्के दिव्यांगांना घर, स्टॉलचे वाटप करण्यात आलेले आहे. त्याच धर्तीवर चर्मकारांच्या समस्यांबाबत आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याशी चर्चा झालेली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून चर्मकारांचे स्टॉल, पीच परवाना आणि इतर समस्यांवर मार्ग काढण्यात येईल, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT