मुंबई

गृहिणींचे काम आव्हानात्मक; अपघाती मृत्युप्रकरणी भरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सुनिता महामुनकर

मुंबई : गृहिणीचे काम हे अत्यंत आव्हानात्मक आणि अतिशय महत्त्वाचे असून घरातील लहान मोठ्यांना जोडणारा दुवा आहे. मात्र अद्यापही ती कौतुकापासून वंचित राहिली आहे, असा महत्वपूर्ण अभिप्राय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. जर गृहिणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला तर तिच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळू शकते, असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.

नव-याचा आधार, मुलांची मार्गदर्शक आणि ज्येष्ठांची काळजीवाहू अशा भूमिकांमधून ती संपूर्ण घर एकत्र ठेवत असते. दिवसरात्र ती वेळेची पर्वा न करता काम करत असते आणि तिच्या कामाची गणना केली जात नाही, कारण तिला त्याचे उत्पन्न मिळत नाही, असेही खंडपीठाने म्हटले.  
रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या नागपुरातील एका महिलेच्या पतीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका केली आहे. त्याच्या पत्नीचे मार्च 2005 मध्ये रस्ते अपघातात निधन झाले. त्यांनी मोटार चालक आणि विमा कंपनीकडून भरपाईची मागणी करणारा दावा मोटार अपघात दावा निवारण मंचकडे दाखल केला होता. हा दावा मंचाने अमान्य केला. गवई यांची पत्नी गृहिणी असून कमावती व्यक्ती नव्हती. त्यामुळे त्यांच्या मृत्युची भरपाई पती आणि दोन्ही मुलांना मिळू शकत नाही, असा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात पतीने उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्या. अनिल किल्लोर यांनी मंचाचा निर्णय रद्दबातल केला. गृहिणीच्या घरातील कामाचे आर्थिक मोजमाप करणे अशक्य आहे. त्याग आणि विविध प्रकारे त्या घरच्यांना सेवा देत असतात, असे न्यायालय म्हणाले. 

‘आठ लाख रुपये द्या’ 
गृहिणीच्या मृत्युनंतर तिच्या पती आणि मुलांचे होणारे नुकसान निश्चित करून त्यावरून पत्नीचे आर्थिक उत्पन्न काढायला हवे, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 2001 मधील निकालाचा आधारही यामध्ये घेण्यात आला आहे. यानुसार न्यायालयाने याचिकादाराच्या पत्नीचे गृहिणी म्हणून तीन हजार रुपये उत्पन्न आणि घरातील कामे करण्यासंबंधी तीन हजार रुपये असे सहा हजार रूपये उत्पन्न निश्चित केले. त्यानुसार पती आणि दोन मुलांना मिळून आठ लाख रुपयांची भरपाई तीन महिन्यात विमा कंपनीने देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT