sadguru 
myfa

video :  शून्य म्हणजे.....

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

इनर इंजिनिअरिंग
आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे नेहमीच एकतर शून्य बनणे किंवा अनंत होणे.  तुम्हाला सोयीस्कर वाटते त्या मार्गाने तुम्ही वाटचाल करा, पण हे दोन वेगळे मार्ग नाहीत. जे काही आहे ते नेहमीच मर्यादित आहे, पण नाही; ते मात्र अनंत आहे. मग नाही आणि अनंत या दोन्ही गोष्टी समान कशा असू शकतात? सर्वांत मोठी संख्या हवी असेल तर तुम्ही १, २, ३, ४, ५ यांची बेरीज करता की ० लावता? 

शून्य म्हणजे काहीही नाही, पण नाही तेच एखाद्या संख्येला अनंत बनवते. गणित शास्त्रात सर्वांत अविश्वसनीय गोष्ट म्हणजे शून्य आणि हे काही अपघाताने घडलेले नाही. ते एका निश्चित अशा साक्षात्कारातून जाणले गेलेय. लोकांनी आपल्या अंतरंगात डोकावून पाहिले आणि अनंताच्या पोकळीत उडी घेतली, तेव्हा शून्याचा आविष्कार झाला. म्हणून शून्याचा शोध पूर्वेकडील देशात लागला हे अपघाताने घडलेले नाही, कारण हे त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या प्रयत्नांचे सार आहे. योगविज्ञान हे आपल्याला शून्य करण्याचे तंत्रज्ञान आहे. कारण शून्य ही साधी गोष्ट नाही. शून्य अनंत आहे. सर्वांचा मुळारंभ शून्य आहे. ही एक संख्यारहित अवस्था आहे. ही मौनाची अवस्था आहे. मौन हरवले कारण संख्या उपस्थित झाल्या. शरीर एकच आहे, पण त्यातून दोन हात बाहेर आले आहेत. पृथ्वी एकच आहे, पण तिच्यातून पुष्कळ लोक बाहेर आलेले आहेत. अस्तित्व एकच आहे, पण त्यातून अगणित विश्व उत्पन्न झाली आहेत. जगातील सर्व आध्यात्मिक संस्कृती अनंत होण्याची इच्छा बाळगून आहेत; कारण त्यांनी पाहिले की निसर्गाचासुद्धा हाच हेतू आहे. ते सृष्टीचा आणि निसर्गाच्या हेतूच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांना कळले की अनंत ही फक्त एक कल्पना आहे. वास्तविक गोष्ट म्हणजे शून्य. म्हणून त्यांनी पोकळीबद्दल बोलायला सुरुवात केली - शून्य, निर्वाण, निर्विकल्प वगैरे.  

मनाचा स्वभाव
मनाचा स्वभाव नेहमीच साठवण्याचा असतो. ते स्थूल अवस्थेत असते तेव्हा त्याला वस्तू साठवायच्या असतात. ते थोडे विकसित होते, तेव्हा त्याला ज्ञान साठवायचे असते. भावना प्रबळ होतात, त्याला लोकांना संग्रहित करायचे असते, पण त्याचा मूलभूत स्वभाव म्हणजे साठवणे.  एखादी व्यक्ती ती आध्यात्मिक मार्गावर असल्याचा विचार करू लागते, तेव्हा तिचे मन आध्यात्मिक ज्ञान गोळा करू लागते. पण अन्न असो, वस्तू असोत, लोक किंवा ज्ञान - तुम्ही काय साठवता याला महत्त्व नाही, जिथे साठवण्याची गरज आहे, याचा अर्थ तिथे अपूर्णता आहे. अपूर्णत्वाचा हा भाव तुमच्यात शिरला आहे; कारण  तुम्ही नाहीत अशा मर्यादित गोष्टींशी तुमची ओळख बांधली. तुम्ही पुरेशी जागरूकता बाणवलीत आणि सर्वांत महत्त्वाचे सतत साधना करत राहिलात, हळूहळू तुमचे पात्र पूर्णपणे रिक्त होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT