नांदेड - जून ते ऑक्टोंबर या पाच महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टी, पूर व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यासाठी शासनाने २८४ कोटी ५२ लाख रुपयांची निधी नांदेड जिल्ह्यात उपलब्ध करुन दिली आहे. शासनाच्या नव्या घोषणेनुसार जिल्ह्यातील पाच लाख ६४ हजार ५१८ हेक्टर बाधीत क्षेत्रासाठी ५६५ कोटी १३ लाख रुपये अपेक्षीत निधी लागणार आहे. यामुळे २८४ कोटींचा निधी वितरीत करताना कोणता निकष लावला जातो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नांदेडमध्ये ता. एक जून ते ता. २२ ऑक्टोबर कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे सोळा तालुक्यातील सात लाख ४४ हजार शेतकऱ्यांच्या पाच लाख ६४ हजार ५१९ हेक्टरवरील खरिप पिकांचे नुकसान झाले होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, मुगासह सोयाबीन, कापूस, ज्वारी या जिरायती पिकासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. यानंतर ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने पुन्हा तडाखा दिला. यात पाच लाख ६४ हजार ५१९ हेक्टरवरील जिरायती, बागायती फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल यंत्रणेने पाठविला होता. यासाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी एकूण ३८४ कोटी ८० लाख १२ हजार १८८ रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शासनाकडे केली होती.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लागले लक्ष
दरम्यान राज्य शासनाने जिरायती व बागायती पिकासाठी प्रति हेक्टर दहा हजार तर फळपिकांसाठी पंचवीस हजार रुपये भरपाई जाहीर केली होती. यामुळे नांदेड जिल्ह्यात जिरायतीसाठी ५६४ कोटी १० लाख ९० हजार व फळपिकांसाठी एक कोटी दोन लाख २५ हजार असे एकूण ५६५ कोटी १३ लाख रुपये अपेक्षीत निधी लागणार आहे. यात मनुष्य हानी, मृत जनावरे, पडझड झालेली घरे, शेतजमिनीचे नुकसानग्रस्तांना वेगळी मदत लागेल. असे असताना शासनाने सोमवारी (ता. नऊ) जारी केलेल्या आदेशात जिल्ह्यासाठी एकत्रीत २८४ कोटी ५२ लाख रुपये दिले आहेत. शासनाने मदतीबाबत वर्गवारी केल्यामुळे हा निधी वितरीत करताना नेमक्या कोणत्या नुकसानग्रस्तांना प्राधान्याने दिला जाईल, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शासनाच्या घोषणेनुसार लागणार निधी
(नुकसान क्षेत्र हेक्टरमध्ये)
हेही वाचलेच पाहिजे - नांदेड ः कंधारची ‘एसबीआय’ बनली दलालांचा अड्डा
दिलेली मदत तोकडी - राजेगोरे
शासनाने उपलब्ध करुन दिलेली मदत तोकडी आहे. दिवाळीच्या तोंडावर शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. घोषणेनुसार लागणारा संपूर्ण निधी वितरीत करावा.
- हणुमंत राजेगोरे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नांदेड.
उर्वरित निधीही द्यावा - इंगोले
शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या वाढीव निधीबाबत स्वागतच आहे. परंतु उपलब्ध निधीतून मदत वितरीत केल्यानंतर उर्वरित निधीही शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावा.
- प्रल्हाद इंगोले, शेतकरी नेते, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.