फोटो
फोटो 
नांदेड

जिल्हाधिकाऱ्यांची दुचाकीवरुन सवारी, वाळू माफियांचे धाबे दणाणले

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नायगाव तालुक्यतील वाळू वाहतुकीच्या ट्रकमुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. या रस्त्यावरुन वाहनेच काय पायी सुद्धा चालणे अवघड आहे. परिसरातील शेतकरी, वाहनधारक आणि पादचारी यांच्या तक्रारी येत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नायगावचे आमदार राजेश पवार यांच्यासमवते या कुंटुर, मेळगाव, धनज आणि सांगवी या रस्त्याची पाहणी केली.

चक्क दुचाकीवर जिल्हाधिकारी आल्याने या परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले. त्यांनी शेतकऱ्यांना दिलास देत रस्ते दुरुस्त झआल्याशिवाय हायवा ट्रकला परवनागी देउ नये अशा सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.

रस्त्यांची झालेली दुरवस्था माध्यमातून चव्हाट्यावर

वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे कुंटूर परिसरातील अनेक गावातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. रस्ते होत्याचे नव्हते झाल्याने या मार्गावरून प्रवास करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था माध्यमातून चव्हाट्यावर येताच नायगावचे आमदार राजेश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह या भागात चक्क दुचाकीवरून जाऊन रस्त्यांची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी या रस्त्याची पाहणी करून या भागात आता अवजड वाहनांना बंदी घातली आहे. त्यामुळे नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात यापुढे रेतीची वाहतूक करणाऱ्या कोणत्याही वाहनाला वाहतूक करता येणार नाही. अशा वाहनांवर तगडी कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

रस्त्यात चिखल आणि खड्डे दिसुन आले

वाळूची अवैध वाहतूक आणि रस्त्यांची बिकट अवस्था या विषयी देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगवी, धनंज, मेळगाव रस्त्याची पहाणी करण्यासाठी आले होते. रस्त्यात चिखल आणि खड्डे दिसुन आले. शिवाय अंगनवाडीचा खाऊ घेऊन जाणारे वाहन खड्यात अडकुन बसले होते. अंगणवाडीचा खाऊ कर्मचारी डोक्यावरून घेऊन जात होते. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी व आमदार यांची वाहन रस्त्यातच अडकली. त्यामुळे दोघांनीही दुचाकीवरून प्रवास करत रस्त्याची पाहणी केली. 

शेती पीक घेण्यासाठी वापरा वाळू साठा नको

रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनावर या भागात वाहतुकीसाठी बंदी घालण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिले. या प्रकरणी नायगाव तहसीलदार सुरेखा नांदे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कारण लिलाव झाला नसतानाही रेतीची वाहतूक होत असताना तहसीलदार कारवाई करत नसल्याच्या तक्रारी यावेळी अनेकांनी केल्या. या सर्व समस्याची चौकशई करु असा विश्‍वास शेतकऱ्यांना दिली. एवढेच नाही तर आपली शेती पीक घेण्यासाठी वापरा वाळू साठा करण्यासाठी नाही असा सल्लाही त्यांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT