File Photo
File Photo 
नांदेड

हा जिल्हा २०२५ पर्यंत हिवताप मुक्त होणार 

शिवचरण वावळे

नांदेड : भारतीय किटकजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन २०१६ मध्ये दिल्लीत दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातील जिल्हे हिवतापमुक्त करण्याचे उदिष्ट्ये ठेवण्यात आले आहे. यासाठी तीन टप्यात हा कार्यक्रम सुरु असून नांदेड जिल्हा हा दुसऱ्या टप्यात म्हणजेच सन २०२५ मध्ये हिवताप मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

आशिया पॅसीफीक विभागातील १८ देशांनी मिळुन नोव्हेंबर २०१५ मध्ये कोलालमपूर मलेशिया येथे घेतलेल्या बैठकीत तीन टप्यात हिवताप दुरीकरण धोरणाला भारत सरकारने पाठिंबा दिला आहे. पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांचा तर दुसऱ्या टप्यात २७ आणि तिसऱ्या टप्यात ३३ जिल्हे हिवतापमुक्त होणार आहेत. यासाठी राज्यातील २२ जिल्ह्यांचा २०२० चा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्यातील नांदेडसह नाशिक, औरंगाबाद, पुणे, सातारा, धुळे, रत्नागिरी, जळगाव, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, जालना, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर व भंडारा या २७ जिल्ह्यांचा यात समावेश आहे. 

नियोजन आराखडा तयार

ठरलेल्या उदिष्टांप्रमाणे जिल्हा हिवतापमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले असून, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी नियोजन आराखडा तयार केला आहे. यात हिवताप मुक्त गावे, हिवताप दुरीकरण आणि हिवताप नियंत्रणात राहणारे गावे अशी विभागणी करण्यात आली आहे.

दिलेल्या वेळेतच जिल्हा हिवतापमुक्त होईल

त्यानुसार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांच्या मार्फत घरोघरी जाऊन भेटीद्वारे तापीचे सर्वेक्षण, रक्त नमुने घेणे, डासांच्या अळ्या नष्ट करणे, क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळ्यांचे वाटप, रुग्णांची व संशयीतांची रॅपीड टेस्टींग तपासणी, गाव, वाडी, तांडे वस्त्या, दुर्गम भाग याशिवाय महापालिका हद्दीत घरोघरी जाऊन आरोग्य तपाणी केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने ठरवून दिलेल्या वेळेतच जिल्हा हिवतापमुक्त होईल अशी कामे सुरु आहेत. 

नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित​
आरोग्य खात्याच्या निर्देशानुसार जिल्हा २०२५ पर्यंत हिवताप या आजारातून मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. त्यासाठी नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे.    
-आकाश देशमुख (जिल्हा हिवताप अधिकारी)
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT