file photo
file photo 
नांदेड

नांदेड : कर्जमाफीचा जिल्ह्यातील एक लाख ४३ हजार शेतकऱ्यांना फायदा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात मागील काही वर्षापासून सतत निसर्ग साथ देत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतात नापिकी होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढले आहे. कधी गारपीट, अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. काही शेतकऱ्यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या देखील केल्या. अखेर राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना घोषित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ९७९ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला. शासनाने एक हजार १० कोटी ९३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे.

जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. शेतकऱ्याने विविध बँका व खाजगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेतात पेरणी केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे ओला दुष्काळ गारपीट कोरडा दुष्काळ आदी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये कर्जास कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या. शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळायला हवी यासाठी जिल्ह्यात आंदोलने देखील झाली.

एक हजार दहा कोटी ९३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा 

राज्य सरकारने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्‍यांना कर्ज मुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेची जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी केली गेली. जिल्ह्यात एक लाख ४२ हजार ९७९ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे एक हजार दहा कोटी ९३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले. त्यामुळे आता शेतकरी कर्जमुक्त होत आहे.

शेतकरी कर्जमाफीचा लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीने करून घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील १५ हजार ६४९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेतले नाही. त्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांनी हक्काचे कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. अनेक प्रकरणे तहसीलदाराकडे प्रलंबित आहेत शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT