Water supply scheme
Water supply scheme 
नांदेड

पाणी मुबलक; परंतु नियोजन शून्य

सकाळ वृत्तसेवा

मुदखेड : मुदखेड तालुक्यात येथे जलक्रांतीचे जनक माजी केंद्रीयमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टी कार्यामुळे आणि उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) कालव्याच्या लाभक्षेत्रामुळे बरेच क्षेत्र बागायती झालेले असून येथील पाण्याची पातळी वाढलेली आहे. या मुळे अनेक गावात मुबलक पाणी आहे, परंतु ग्रामपंचायतीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

तालुक्यात बहुतांशी गावे, वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाई तेवढ्या प्रमाणात भासत नाही. परंतु महावितरण कंपनीच्या तांत्रीक अडचणीमुळे ग्रामस्थांना उन्हाच्या तडाख्यात दुरवरून पाणी आणावे लागत आहे. मुदखेड पंचायत समिती स्तरावर पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक योजित करण्यात आली होती यामध्ये गावनिहाय आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत २३ गावात नवीन विंधन विहीर, सात गावांमध्ये विशेष दुरुस्ती योजना, चार गावांमध्ये पूरक नळ योजना, तर कोल्हा या गावातुन अधिग्रहण प्रस्ताव मागविण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता राजू पांचाळ यांनी दिली आहे.

मुदखेड तालुक्यातील बहुतांश गावे-वाड्यावर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) कालव्याच्या मध्यामातून कॅनॅालद्वारे पाणी पुरवठा मुबलक आहे. तर काही गावे हे गोदावरी नदीच्या काठावर बसलेले असल्यामुळे पाण्याची तेवढ्या प्रमाणात समस्या भेडसावत नाही. मुदखेड तालुक्यातील निवघा आणि वाई गावासाठी माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने पाणी पुरवठ्याच्या कामांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत दोन्ही गावांना मिळून दीड कोटी रुपये निधी मंजूर केला गेला होता. परंतु सदरील योजनेतून संबंधित कंत्राटदाराने या दोन्ही गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्ण न करता अर्धवट कामे करून पळ काढला आहे. यामुळे या गावातील सदरील योजना ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत यामध्ये शासनाचा लाखो रुपयांचा निधी व्यर्थ खर्च झाला आहे आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती, परंतु सदर मागणी व चौकशी अजूनही गुलदस्त्यातच आहे.

''एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढला असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. सद्यस्थितीत कोणत्या गावात पाणी टंचाई ही समस्या नाही, काही प्रमाणात नैसर्गिक स्रोत आटू लागल्याने भविष्यात काही गावांत तीव्र पाणीटंचाई नाकारता येत नाही. गाव व वाडी वस्तीजवळ पाणी उपलब्ध आहे, काही गावात उपाययोजनेची गरज असल्यामुळे तशा प्रकारचा पाण्याचा आराखडा तयार केलेला आहे.''

- कैलास गायकवाड, विस्तार अधिकारी, पंचायत समिती मुदखेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT