nnd12sgp02.jpg
nnd12sgp02.jpg 
नांदेड

पाण्यातून शोधावी लागते वाट

प्रभाकर लखपत्रेवार


नायगाव, (जि. नांदेड) : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील गोदमगाव-आंचोली- हिप्परगा कृष्णूर-बरबडा हे २२ किमीचे काम तीन वर्षांपासून रखडले असून संबंधित कंत्राटदाराने पुलाचे काम केले नसल्याने कुष्णूर येथील शेतकरी व नागरिकांना कंबरे इतक्या पाण्यातून वाट शोधावी लागत आहे. त्यामुळे सदरचे काम लवकर पूर्ण करुन पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस दत्तात्रय पाटील जाधव यांनी पालकमंत्र्याकडे केली आहे. 

गोदमगाव-आंचोली-हिप्परगा-कृष्णूर-बरबडा हा रस्ता ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे काम मंजूर झाले. १० कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या २२ किमीच्या कामाचा (ता.११) सप्टेंबर २०१७ मध्ये शुभारंभ झाला. सदरचे काम १५ महिण्यात पुर्ण करण्याचा करार होता.


लहान मोठे पुल बांधण्याचाही या कामात समावेश होता. पण सदरचे काम मागच्या तीन वर्षांपासून रखडल्याने दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम झाले नाही. याचा फटका कुष्णूर येथील शेतकरी व नागरिकांना बसत आहे. कुष्णूरच्या गावकुसाबाहेरुन एक छोटी नदी वाहते. दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता अनेक दिवस बंदच राहतो, तर नदीच्या पलीकडे शेती असलेल्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. संबंधित कंत्राटदाराने मागच्या तीन वर्षांत या पुलाचे काम केले नसल्याने या दिरंगाईचा फटका नागरिकांना व शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय पाटील जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे एक निवेदन देवून रखडलेल्या कामाचा पाढा वाचला. 


कृष्णुर - हिप्परगा दरम्यानच्या पुलाचे काम झाले नसल्याने दोन्ही गावच्या नागरिकांना व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले व पुलाचे काम लवकर पूर्ण करुन उंची वाढवण्यात यावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे गोदमगाव-आंचोली- हिप्परगा-कृष्णूर-बरबडा हे काम पूर्ण करण्यासाठी १५ महिण्याचा कालावधी होता पण ३६ महिने झाले तरी काम अर्धवट अवस्थेत असताना या कामावर देखरेख व नियंत्रण ठेवणारे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे अधिकारी कुठलीच कारवाई करण्यास तयार नाहीत. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT