पश्चिम महाराष्ट्र

अतिवृष्टी, पूरामुळे शेतीपिक नुकसानीसाठी ५३ कोटी निधी उपलब्ध

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी; पाच तालुकत्यातील शेतकऱ्यांना तातडीने वाटप

विष्णू मोहिते

सांगली : माहे जुलै महिन्यातील अतिवृष्टी व पूरामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याकरीता सांगली जिल्ह्यासाठी ५२ कोटी ७५ लाख अनुदान उपलब्ध झाले आहे. मिरज, तासगाव, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यांना शेतकऱ्यच्या थेट बॅंक खात्यावर उपलब्ध करुन दिले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

दोन महिने झाल्यानंतरही मदत मिळाली नसल्याने शेतकरी यांच्यात प्रचंड नाराजी पसरत आहे. याबाबत प्रसार माध्यमांनी त्याची दखल घेतल्याने प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या. जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे जिल्ह्याला सुमारे एक हजार कोटी रुपयांचा फटका बसला. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. १ लाख ५६५ शेतकऱ्यांचे ३९ हजार ६९५ हेक्टर जमिनीचे पंचनामे झाले. शेतीचे ५४ कोटींचे नुकसान झाले होते.

सव्वा दोन महिन्यानंतर सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५५० कोटी वर्ग केले. पुणे विभागासाठी १५० कोटींची मदत होती. सरकारने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे रक्कम वर्ग केली. मदत मिळण्याबाबत विलंब होत होता. अतिवृष्टी आणि कोयना, चांदोली धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ऊस, सोयाबीन, भुईमूग, केळी आणि भुईमूग पिकांना फटका बसला होता. उभी पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली. तर संपूर्ण ऊस पाण्यात बुडाल्याने तो वाया गेला. पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली होती.

तालुकानिहाय अनुदान असे

शेतीपिके, बहुवार्षिक पिके नुकसानीसाठी तालुकानिहाय उपलब्ध करून देण्यात आलेले अनुदान असे- मिरज - १६ कोटी ७७ लाख ६८ हजार रूपये, तासगाव - ३ लाख १५ हजार रूपये, वाळवा - १८ कोटी ९२ लाख ७ हजार रूपये, शिराळा - ६ कोटी ४७ लाख ६५ हजार रूपये, पलूस - १० कोटी ५४ लाख ४५ हजार रूपये. असे एकूण ५२ कोटी ७५ लाख रूपये इतके अनुदान बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा निधी संबंधित तह‍सीलदार खर्च करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT