All the exams in the state except the final year exams have been canceled. 
पश्चिम महाराष्ट्र

राज्यातील या परीक्षा रद्द : विद्यापीठ कोणती घेणार भूमिका, विद्यार्थ्यांना पडला प्रश्‍न.....

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव :  राज्यातील अंतीम वर्षाच्या परीक्षा वगळता सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, परीक्षा शुल्काच काय असा प्रश्‍न आता विद्यार्थ्यांना पडला आहे. यामुळे राणी चन्नमा विद्यापीठाने यासंबंधी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे. 

कोरोनामुळे 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे महाविद्यालये बंदच आहेत. जुलै महिना सुरु झाला तरी देखील महाविद्यालये सुरु होण्यासंबंधी कोणताच निश्‍चित असा  निर्णय झालेला नाही. परीक्षा होणार या दृष्टीकोणातून राणी चन्नमा विद्यापीठाने आपल्या अंतर्गत आलेल्या सर्व पदवी आणि पदव्यूत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरून घेतले होते. मात्र, परीक्षाच रद्द झाल्यामुळे परीक्षा फी संबंधी विद्यार्थ्यांतून चर्चा होत आहे. 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री अश्वत्थ नारायण यांनी शुक्रवारी  परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. कोरोनामुळे यंदा पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सेमिस्टरची परीक्षा वगळता डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर व इतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षेबाबतचा विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे. मात्र, परीक्षा फी मिळणार की नाही यासंबंधी संभ्रम कायम राहिला आहे. विद्यार्थ्यांना सरासरी गुण काढून उत्तीर्ण करीत त्यांना नवीन वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

मात्र विद्यार्थी ज्या परीक्षेत नापास झाले आहेत, ते विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. अंतीम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असला तरी परीक्षा काळात राज्यात कोरोनाची स्थिती कशी असेल, याचा विचार करुन परीक्षेचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत सुमारे 350 महाविद्यालये येतात. यातून सुमारे सव्वालाख विद्यार्थी पदवी व पदव्यूत्तर शिक्षण घेतात. सध्या फक्त अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. 


सध्या फक्त अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पुन्हा मिळावे अशी मागणी होत आहे. यासंबंधी आम्ही उच्चशिक्षण खात्याला कळविले आहे. त्यांच्या सूचनेनंतर निर्णय घेण्यात येईल. 
-रामचंद्रगौडा, कुलगुरु, राणी चन्नमा विद्यापीठ 


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT