Sanjay Raut on Belgaum Election
Sanjay Raut on Belgaum Election Sanjay Raut
पश्चिम महाराष्ट्र

शिवसेना बेळगावातील सर्व निवडणुका लढविणार : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : बेळगावमध्ये एकीकरण समिती ज्या पद्धतीने फुटते आहे, त्यामुळे मराठी माणसाची एकजूट अडचणीत आली आहे. त्याचा फटका फक्त बेळगावलाच नव्हे, तर कोल्हापूर, सांगली अशा सीमाभागालाही बसत आहे. आता यापुढे तिथे शिवसेना म्हणून येऊ. शिवसेना बेळगावातील सर्व निवडणुका स्वतः लढवेल, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.(Sanjay Raut on Belgaum Election)

संभाजीराजे यांनी केलेल्या ट्विटबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले, ‘श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांबाबत जसा आदर आहे, तसेच माजी खासदार संभाजीराजेंविषयीही प्रेम आहे. आम्हाला वादातून कोणतेही राजकारण करायचे नाही. पण संभाजीराजेंना पुढे करून ज्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची उडी फसली. शिवसेनेचे मन साफ आहे. कधीही पाठीमागून वार करत नाही. शाहू महाराजांना अभिवादन करणे आमचे कर्तव्य आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच ठाकरे घराण्याचे शाहू महाराजांच्या घराण्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. संभाजीराजे यांना सांगितले होते दोन जागा आहेत. राज्यसभेवर जायचे असेल तर शिवसेनेची उमेदवारी घ्या. आमची मते तुम्हाला देऊ.

...अन्यथा तुमच्याशिवाय ठरवू

‘आमचं ठरलयं’ या मुद्यावर बोलताना खासदार राऊत यांनी महाविकास आघाडीच्या लोकांशी संपर्क सुरू आहे. आता कोल्हापुरात यापुढे एका-दोघांचे ठरलयं असे चालणार नाही. आघाडी म्हणूनच ठरलं पाहिजे, नाही तर तुमच्याशिवाय आम्ही ठरवू व आमचा निर्णय घेऊ, असा इशारा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT