Congress, NCP
Congress, NCP 
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी नक्की होणार : पृथ्वीराज

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड : आगामी निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी नक्की होणार आहे. त्यात चारच जागांवर आमची बोलणी सुरू आहे. तीही खेळीमेळीत पार पडेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व्यक्त केला. यावेळी  एमआयएमला सोबत घेणार नसल्याचे सांगताना प्रकाश आंबेडकर यांना घेण्यासाठी आम्ही अनुकूल आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

चव्हाण म्हणाले, लोकसभेला 26 व 22 तर विधानसभेसाठी 161 व 128 चा फार्म्युला आम्ही कायम ठेवणार आहोत. त्याच अनुषंगाने आणची बोलणी सुरू आहेत. त्यात बोलणी यशस्वी होतील. त्यामुळे आघाडी नक्की होईल. ज्या जागांवर बोलणी सुरू आहेत. त्या जागा अत्यंत खुलेपणाने व खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यातही काही अडचण येईल, असे वाटत नाही. एमआयएमसारख्या पक्षाला आम्ही तर बरोबर घेणार नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्यास आम्ही तयार आहोत. प्रकाश आंबडेकरांनी कोणाबरबोर जायचे व कोणाला विरोध करायाचे हा त्यांचा प्रश्न आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला राष्ट्रावादी सोबत घेत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला तरी अजून त्यातील काही माहिती नाही. 

चव्हाण म्हणाले, राज्यावर दुष्काळाचे गंभीर सावट आहे. अशात दुष्काळग्रस्त म्हणून जास्ती तालुके येऊ नयेत असे महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न दिसत आहेत. दुष्काळी भागाला उपाययोजना देण्याऐवजी चालढकल केली जात आहे. 2016 मध्ये केंद्र सरकारने दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य सरकारने 7 ऑक्टोबर 2017 ला अध्यादेश काढला आणि त्याप्रमाणे दुष्काळ ठरविण्याची पद्धत जाहीर केली. त्यानुसार मध्यंतरी 171 तालुके दुष्काळसदृश्य जाहीर केले. मुळातच सदृश्य हा शब्क वापरता येत नाही किंबहुना गोंधळ निर्माण करणारा आहे. त्यामध्येच 31 ऑक्टोबरला 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. पर्जन्यमान, जमिनीतील ओलाव्याची स्थिती, उपग्रहातून दिसणारी हिरवळ, त्यांच्या अंतर्गत पाहणी करून सुरवातीला दोनशे तालुके नंतर 171 तालुके आणि आता 151 तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे सांगत आहेत.

आंध्र प्रदेशने 8 ऑगस्टला तसेच कर्नाटक सरकारने 14 सप्टेंबरला त्यांच्या राज्यात दुष्काळ जाहीर केला. उपाय योजनाही सुरू केल्या. महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करून उपाययोजना सुरू करण्यास दिरंगाई केली. दुष्काळाबाबतीत सरकार गंभीर नाही. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत साडे सात हजार कोटी रुपये खर्च करून 16 हजार गावे दुष्काळमुक्त झाली असे पंतप्रधान मोदी यांनी शिर्डी येथील कार्यक्रमात सांगितले होते. मग राज्यात एवढा भीषण दुष्काळ का पडला, हा सामान्य लोकांचा प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT