Pandharpur-Flood
Pandharpur-Flood 
पश्चिम महाराष्ट्र

पंढरपूरमधील पूर ओसरल्याने नागरिकांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी कमी करण्यात आलेले असल्याने पंढरपूर शहरातील पाण्याची पातळी आज (गुरुवार) कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रदक्षिणा रस्त्यावर आलेले पाणी पूर्णपणे ओसरले आहे.

काल (बुधवार) रात्री दहा वाजेपर्यंत पंढरपूर येथे पाण्याची पातळी वाढत होती. त्यानंतर पाण्याची पातळी स्थिर झाली आणि मध्यरात्रीपासून पाणी हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली.

काल रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील भजनदास चौक, घोंगडे गल्ली, सरकारी दवाखाना, गोविंदपुरा या भागांमध्ये पाणी आले होते. या भागातील पाणी आज कमी झाले आहे. प्रदक्षिणा रस्त्यावरील पाणी पूर्णपणे ओसरले होते.

तथापि, आज उजनी धरणातून दुपारी बारा वाजता 1 लाख 20 हजार आणि वीर धरणातून 62 हजार क्‍युसेक पाणी सोडले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: धोकादायक डेव्हिड मिलर आऊट; सुरुवातीच्या धक्क्यांनंतर गुजरातचा सावरला डाव

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT