fort.jpg
fort.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

किल्ले संर्वधनासाठी केंद्राकडे शंभर कोटींची मागणी 

प्रशांत देशपांडे

सोलापूर : महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याचे मॉडेल पोर्ट बनविण्याचे काम आता सुरू आहे. त्या धर्तीवर राज्यातील 10 किल्ल्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे 100 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यानुसार अर्थ विभागातील अधिकारी एन.के.सिंग यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रविवारी सोलापूरात सकाळशी बोलताना दिली. 

महाराष्ट्रात सद्यस्थितीत 80 किल्ले असून, त्यातील राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाकडे 40 किल्ले आहेत. तर केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागामार्फत उर्वरित 40 किल्ल्यांचे संर्वधन केले जात आहे. त्यातील रायगड या किल्ल्याचे मॉडेल पोर्ट करण्याचे काम सुरू आहे. सोलापूरातील भुईकोट किल्ल्यांसह महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग, पन्हाळगड, विर्दभातील 2 किल्ल्यांसह अन्य पाच किल्ल्यांच्या सवंर्धनासाठी व विकासासाठी केंद्र सरकारकडे शंभर कोटींची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, तो निधी मिळाल्यानंतर ऐतिहासिक वारसा जतन होऊन पर्यटकांसाठी किल्ले आकर्षण ठरतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. निधीबाबत अनेकवेळा दिल्लीत बैठकाही पार पडल्या असून लवकरच निधी मिळेल आणि कामाला सुरुवात होईल, असेही ते म्हणाले. सोलापूरातील भुईकोट किल्ल्याची दुरावस्था झाली असून, त्याच्याही विकासासाठी आपला पाठपुरावा सुरु असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT