पश्चिम महाराष्ट्र

महामार्गांच्या कामातून मिळेल सोलापूरच्या विकासाला चालना

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या विकास आणि चौपदरीकरणातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज  व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त महादेव तांबडे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभु, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त पोलिस मुख्यालयात ध्वजारोहण आणि संचलनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलिस दलाच्या विविध पथकांनी संचलनाद्वारे मानवंदना दिली. त्याचबरोबर पोलिस महासंचालक पदक मिळालेल्या पोलिस अधिकारी -कर्मचारी, गुणवंत तलाठी यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, सोलापूर-सांगली, सोलापूर-विजापूर, सोलापूर-तुळजापूर याचबरोबर जिल्ह्यातून जाणार्‍या पालखी मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. या रस्त्यांच्या विकासामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. सोलापूरचा विविध शहरांशी जलद संपर्क झाल्यामूळे व्यापार, उद्योग याचबरोबर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. 

मुद्रा बँक योजनेतून 1022 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करुन सोलापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात नवउद्योजक घडतील, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री देशमुख म्हणाले, जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख आठ हजार       शेतक-यांना 561 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. जिल्ह्याने यंदाही राज्यात प्रथम क्रमांक पटकावला पाहिजे.

जिल्हा परिषद विविध योजनांच्या माध्यमातून विकास विषयक चांगले काम करीत आहे. विशेषत: आरोग्याच्या क्षेत्रात जिल्हा परिषदेने केलेले काम उल्लेखनीय आहे. स्वच्छ भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्हा परिषदेने नवा पॅटर्न विकसित केला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 300 किलोमीटरवर रस्ते तयार होतील. यामुळे गावांचा शहरांशी असणारा संपर्क वाढेल, असेही श्री. देशमुख म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT