Farmers of Kadegaon will agitate if the cycle of tembhu is not started 
पश्चिम महाराष्ट्र

टेंभूचे आवर्तन सुरू न केल्यास कडेगावचे शेतकरी करणार आंदोलन 

संतोष कणसे

कडेगाव : रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचे आवर्तन तात्काळ सुरु करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा तालुक्‍यातील टेंभूच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे. तालुक्‍यात यावर्षी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

त्यामुळे तालुक्‍यातील भूजल पातळीत मोठी वाढ झाली होती. परंतु आता रब्बी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात विहिरी व कुपनलिकांतून उपसा होत आहे. त्यामुळे पुन्हा विहिरी व कुपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. परिणामी आता पिकांना पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे. 

तर आता रब्बी हंगाम चांगलाच बहरला असून तालुक्‍यात 11 हजार 912 हेक्‍टर इतके सरासरी क्षेत्र आहे. तर उसाचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे रब्बी व ऊस यासह अन्य पिकांना आता पाण्याची आवश्‍यकता आहे. काही ठिकाणी पाण्याअभावी पिके वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा रब्बी हंगामासाठी टेंभु योजनेचे आवर्तन तत्काळ सुरु करावे, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून जोर धरु लागली आहे. अन्यथा पाण्यासाठी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही टेंभुच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे. 

टेंभू योजनेचे रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरु करण्याची कार्यवाही सुरु असून पुढील आठवड्यात आवर्तन सुरु होईल.परंतु शेतकऱ्यांनी पाण्यासाठी लेखी मागणी करावी.तसे केल्यास मागणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन करणे सोपे होईल. 
- नरेंद्र घार्गे, सहायक कार्यकारी अभियंता, टेंभू योजना

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गजब बेइज्जती है यार! पाकिस्तानी खेळाडू मैदानात वाट बघत होते, टीम इंडियानं तोंडावर दरवाजा बंद केला; VIDEO VIRAL

Latest Marathi News Updates : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक; बीडमध्ये आज विराट मोर्चा

IND vs PAK : टीम इंडियाचा पवित्रा अन् शोएब अख्तरची रडारड! म्हणाला, तुम्ही राजकारण आणताय, आम्ही बरंच काही बोलू शकतो, पण...

Pune News : गुलटेकडी मार्केटमध्ये ‘जी-५६’ जागांचा गैरवापर, लिलाव वगळून १७ जागांचे केवळ पत्राद्वारे वाटप; प्रशासन मौनात

Nagpur News: नगरधन आठवडी बाजारात भीषण दुर्घटना; मद्यधुंद अवस्थेत गरम तेलाच्या कढईत पडल्याने युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT